शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

Maharashtra Election 2019 ; मतदान टक्केवारीने गाठली सत्तरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी बहुतांश केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मंगळवारची सायंकाळ झाली.

ठळक मुद्दे्गेल्या दोन निवडणुकींपेक्षा सरस : गडचिरोली, अहेरीत २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तीनही मतदार संघाची विधानसभा निवडणूक यावेळी अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. अभूतपूर्व जनजागृतीसोबतच नक्षलवाद्यांचे हिंसक कारवाया करण्याचे मनसुबे हाणून पाडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. परिणामी गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी पार करण्यात यावेळी यश आले.मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार सर्वाधिक ७१.२ टक्के मतदान आरमोरी मतदार संघात झाले आहे. गडचिरोलीत ६८.४७ तर सर्वात जास्त नक्षलप्रभावित आणि दुर्गम भाग असलेल्या अहेरीत ७०.३४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झालेली नव्हती. काही केंद्रांवरील आकड्यांची भर त्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीनही मतदार संघातील ७ लाख ७५ हजार ३६९ मतदारांपैकी जवळपास साडेचार लाखावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे ९३२ मतदान केंद्रांपैकी ४५ टक्के मतदान केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल होते. त्यापैकी एटापल्ली तालुक्यात काही मतदान केंद्र वेळेवर दुसरीकडे हलविण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र तरीही त्यांनी मोठ्या हिमतीने त्या केंद्रांवर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. नक्षलवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाला भीक न घालता मतदारांनी विविध अडचणींवर मात करत दाखविलेली हिंमत प्रशासकीय यंत्रणेच्या उत्साहात भर घालणारी ठरली. दुर्गम भागात युवा पिढीपेक्षाही प्रौढ मतदारांमध्ये जास्त उत्साह आणि आशा दिसून आली.३१ तासानंतर नेमकी टक्केवारी नाहीचसंवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी बहुतांश केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मंगळवारची सायंकाळ झाली. त्यानंतर बुथनिहाय सर्व आकडेवारी पडताळणी करण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यापासून ३१ तासानंतरही म्हणजे मंगळवारच्या रात्री १० वाजतापर्यंत मतदानाच्या टक्केवारीचा अंतिम आकडा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला नव्हता.नक्षलवाद्यांचे मनसुबे फेलनक्षलवाद्यांकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही घातपाती कारवाया, गोळीबार, भूसुरूंग स्फोट घडवून आणले जाण्याची शक्यता पाहता पोलीस दलाने योग्य ती खबरदारी घेत सर्व तयारी केली होती. त्यामुळे नक्षलवादी कोणत्याही कारवाया घडवून आणण्यात यशस्वी झाले नाही. गेल्या अनेक निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत नक्षली कारवाया नियंत्रणात राहिल्या.अभूतपूर्व जनजागृतीनिवडणुकीचे कर्तव्य प्रत्येक मतदाराने पार पाडाने यासाठी जिल्हाभरात अभूतपूर्व अशी जनजागृती झाली. शाळा-महाविद्यालयांपासून तर सण-उत्सवापर्यंत सर्वच ठिकाणी मतदानाचे महत्व सांगण्यात आले. गावागावात रॅली काढून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून नक्षली दहशतीतही नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली