शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Maharashtra Election 2019 ; आता गुप्त प्रचारावर जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील तीनही मतदार संघांमधील ९३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४५ टक्के केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच तीन हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर नेण्याचे काम सुरू होते. शनिवारीही हे काम सुरूच होते.

ठळक मुद्देरॅलींमधून उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन । निवडणुकीचे भोंगे झाले शांत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी दुपारी ३ वाजता शांत झाली. अनेक उमेदवारांनी शहरी भागात रॅलींमधून शक्तीप्रदर्शन करत मतदारांना शेवटचे आवाहन केले. आता सोमवारच्या सकाळपर्यंत गुप्त प्रचारातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होणार असल्यामुळे विविध पथकांसह पोलीस यंत्रणेला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.जिल्ह्यातील तीनही मतदार संघांमधील ९३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४५ टक्के केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच तीन हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर नेण्याचे काम सुरू होते. शनिवारीही हे काम सुरूच होते. याशिवाय इतर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या बस व इतर वाहनांनी रवाना करण्यात आले.शनिवारी अहेरी मतदार संघातील २२३ केंद्रांवरील कर्मचारी, आरमोरी मतदार संघातील १३५ केंद्रांवरील कर्मचारी तर गडचिरोली मतदार संघातील ९० केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी विविध साहित्यासह रवाना करण्यात आले.आतापर्यंत नाकाबंदीदरम्यान केलेल्या वाहनांच्या तपासणीत अनधिकृत रक्कम, दारू आणि दारूची आयात करणाऱ्या वाहनांना मिळून एकूण ८५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. विशेष म्हणजे गडचिरोलीच्या सभोवताल सीमा लागून असणाऱ्या छत्तीसगड आणि तेलंगणासह एकूण ७ जिल्ह्यांच्या सीमेत ५ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात दि.२१ पर्यंत दारूबंदी लागू करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.प्रत्येक मतदार संघात सखी बुथ (सर्व महिला कर्मचारी) राहणार असून गडचिरोली मतदार संघात ३, तर आरमोरी आणि अहेरी मतदार संघात प्रत्येकी एक बूथ सखी बुथ राहणार आहे. त्या ठिकाणी ेकेंद्राधिकाऱ्यापासून तर सुरक्षा रक्षकापर्यंत सर्व जबाबदाºया महिलांकडेच राहतील.मतदानाची सर्वोच्च टक्केवारी गाठण्याचे आवाहनजिल्ह्यातील मतदार सूज्ञ असून प्रत्येक मतदार मतदानाचा अधिकार बजावतील, असा विश्वास व्यक्त करताना या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी लोकसभेत झालेल्या मतदानाची टक्केवारी (७१.९८ टक्के) पार करून सर्वोच्च टक्केवारी गाठावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले. त्यांनी निवडणुकीच्या तयारीची पूर्ण माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे, ना.तहसीलदार सुनील चडगुलवार उपस्थित होते.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली