शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Maharashtra Election 2019 ; उमेदवारांकडून शेवटचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे पक्ष कार्यालय उघडले व तेथून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराची सूत्रे हलविली.

ठळक मुद्देउद्या प्रचार थांबणार : शहरी भागात येणार प्रचाराला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याला सुरूवात झाली असून शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबणार आहे. उमेदवारांकडे आता दोनच दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा जोर व वेग वाढविण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ८ ऑक्टोबरपासून उमेदवारांना प्रचार करता येणार होता. मात्र या दिवशी दसरा असल्याने अनेक उमेदवारांनी ९ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरूवात केली. सुरूवातीच्या दिवसात दुर्गम व ग्रामीण भागात प्रचार करण्यावर विशेष भर देण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे पक्ष कार्यालय उघडले व तेथून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराची सूत्रे हलविली.गडचिरोली शहरात जवळपास ३० हजार मतदार आहेत. त्यामुळे निकालाच्या दृष्टीने गडचिरोली शहराचा कल कोणत्या बाजूने राहतो, हे ही महत्त्वाचे ठरणार आहे. तरीही आजपर्यंत गडचिरोली शहरात पाहिजे तेवढा प्रचार करण्यात आला नाही. शुक्रवारी व शनिवारी उमेदवारांकडून गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या शहरांमध्ये प्रचार रॅली काढल्या जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उमेदवारांकडून नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते बोलावून शहरात गर्दी करून आपली ताकद अधिक दाखविण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. शुक्रवारी व शनिवारी पक्षांच्या रॅलींनी शहरे गजबजून जाण्याची शक्यता आहे.शनिवारनंतर केला जाणार छुपा प्रचारमतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदानाच्या वेळेपासून ४८ तासांपूर्वी प्रचार बंद करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाते. त्यानुसार शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक विभागाच्या नियमानुसार जाहीर व खुलेआम प्रचार बंद होणार असला तरी उमेवार व त्यांचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने प्रचार करतील. हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. याच कालावधीत मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विविध प्रलोभने दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम करण्याची जबाबदारी गावातील जबाबदार कार्यकर्त्यावर दिली जाते. विशेष म्हणजे रविवारी रात्री सुद्धा मतदारांच्या भेटी घेतल्या जातील. ग्रामीण भागात हे प्रकार अधिक प्रमाणात घडतात.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली