शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

Maharashtra Election 2019 ; उमेदवारांकडून शेवटचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे पक्ष कार्यालय उघडले व तेथून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराची सूत्रे हलविली.

ठळक मुद्देउद्या प्रचार थांबणार : शहरी भागात येणार प्रचाराला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याला सुरूवात झाली असून शनिवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबणार आहे. उमेदवारांकडे आता दोनच दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा जोर व वेग वाढविण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ८ ऑक्टोबरपासून उमेदवारांना प्रचार करता येणार होता. मात्र या दिवशी दसरा असल्याने अनेक उमेदवारांनी ९ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरूवात केली. सुरूवातीच्या दिवसात दुर्गम व ग्रामीण भागात प्रचार करण्यावर विशेष भर देण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे पक्ष कार्यालय उघडले व तेथून तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचाराची सूत्रे हलविली.गडचिरोली शहरात जवळपास ३० हजार मतदार आहेत. त्यामुळे निकालाच्या दृष्टीने गडचिरोली शहराचा कल कोणत्या बाजूने राहतो, हे ही महत्त्वाचे ठरणार आहे. तरीही आजपर्यंत गडचिरोली शहरात पाहिजे तेवढा प्रचार करण्यात आला नाही. शुक्रवारी व शनिवारी उमेदवारांकडून गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या शहरांमध्ये प्रचार रॅली काढल्या जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उमेदवारांकडून नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते बोलावून शहरात गर्दी करून आपली ताकद अधिक दाखविण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. शुक्रवारी व शनिवारी पक्षांच्या रॅलींनी शहरे गजबजून जाण्याची शक्यता आहे.शनिवारनंतर केला जाणार छुपा प्रचारमतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदानाच्या वेळेपासून ४८ तासांपूर्वी प्रचार बंद करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाते. त्यानुसार शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक विभागाच्या नियमानुसार जाहीर व खुलेआम प्रचार बंद होणार असला तरी उमेवार व त्यांचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने प्रचार करतील. हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. याच कालावधीत मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विविध प्रलोभने दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम करण्याची जबाबदारी गावातील जबाबदार कार्यकर्त्यावर दिली जाते. विशेष म्हणजे रविवारी रात्री सुद्धा मतदारांच्या भेटी घेतल्या जातील. ग्रामीण भागात हे प्रकार अधिक प्रमाणात घडतात.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली