शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

‘मेडीगड्डा’च्या जड वाहनांनी राष्ट्रीय महामार्गाची ऐसीतैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:27 IST

छत्तीसगडमधील जगदलपूर ते तेलंगणामधील निजामाबाद, व्हाया सिरोंचा (महाराष्ट्र) अशा तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची गडचिरोली जिल्ह्यातील भागाची स्थिती सध्या चांगलीच वाईट झाली आहे. तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे या भागातील महामार्ग जागोजागी उखडून गेला आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, की ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देधोकादायक वाहतूक : क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांनी उखडला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगडमधील जगदलपूर ते तेलंगणामधील निजामाबाद, व्हाया सिरोंचा (महाराष्ट्र) अशा तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची गडचिरोली जिल्ह्यातील भागाची स्थिती सध्या चांगलीच वाईट झाली आहे. तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे या भागातील महामार्ग जागोजागी उखडून गेला आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, की ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर मार्गाची २००७ मध्ये बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) मार्फत बांधणी झाली होती. २०११ मध्ये हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. तत्कालीन कामाच्या दर्जामुळे दगदलपूर ते निजामाबाद हा जवळपास ६०० किलोमीटरचा मार्ग आजही तग धरून आहे. परंतू राजीवनगर ते कोत्तापल्ली, वडधमपर्यंतचा महाराष्ट्राच्या हद्दीतील जवळपास २६ किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी उखडून गेला आहे.३५ टन वजन सहन करणाºया या मार्गावर मेडीगड्डा प्रकल्पाचे ७० टन वजनापर्यंतचे ट्रक बिनदिक्कतपणे अहोरात्र चालत आहेत. त्या भागातील रस्ता एवढे वजन सहन करू शकत नसल्याने उखडून जाऊन जागोजागी खड्डेमय झाला आहे. याचा त्रास गडचिरोली जिल्ह्यातील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.सिरोंचा शहरानजिक गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पाच्या कामावरील जड वाहनांची वर्दळ सतत या रस्त्यावरून सुरू असते. रस्त्यावरून उडणारी धूळ आणि खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन बºयाच लोकांना जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले. पण रस्त्याच्या दुरूस्तीसाठी किंवा जड वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांत कोणीही पुढाकार घेतला नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरूस्ती होण्याची शक्यता कमीच आहे.दुरुस्तीचा खर्च मेडीगड्डा प्रकल्पाने द्यावाविशेष म्हणजे याच मेडीगड्डा प्रकल्पाची जड वाहने तेलंगणा राज्यातूनही साहित्याची वाहतूक करतात. पण तेलंगणाच्या हद्दीत त्या वाहनांसाठी गुळगुळीत रस्ते बनविण्यात आले आहेत. मेडीगड्डा प्रकल्पाची वाहने जात असलेला एकही रस्ता तेलंगणाच्या हद्दीत खराब अवस्थेत दिसत नाही. मग महाराष्ट्राच्या हद्दीतील रस्त्यांसाठीच भेदभाव का? असा प्रश्न या भागातील नागरिक करीत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी कोणत्याही उपयोगाच्या नसलेल्या या प्रकल्पाने या भागातील चांगले रस्तेही खराब करून अनेकांचा बळी घेतल्याने या रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च मेडीगड्डा प्रकल्पाकडूनच वसूल करावा, अशीही मागणी काही सूज्ञ नागरिकांनी केली आहे.मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे हा रस्ता जास्त खराब झाला आहे. या प्रकल्पाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी तात्पुरते खड्डे बुजवून त्यांच्या वाहनांची सोय केली होती. परंतू रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे त्याच्या पुनर्बांधणीची गरज आहे. या कामाला शासनाकडून मंजुरीही मिळाली आहे. निवडणूक आचारसंहितेनंतर त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल.- अतुल मेश्राम,कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग विभाग