शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

‘मेडीगड्डा’च्या जड वाहनांनी राष्ट्रीय महामार्गाची ऐसीतैसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:27 IST

छत्तीसगडमधील जगदलपूर ते तेलंगणामधील निजामाबाद, व्हाया सिरोंचा (महाराष्ट्र) अशा तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची गडचिरोली जिल्ह्यातील भागाची स्थिती सध्या चांगलीच वाईट झाली आहे. तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे या भागातील महामार्ग जागोजागी उखडून गेला आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, की ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देधोकादायक वाहतूक : क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांनी उखडला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगडमधील जगदलपूर ते तेलंगणामधील निजामाबाद, व्हाया सिरोंचा (महाराष्ट्र) अशा तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ची गडचिरोली जिल्ह्यातील भागाची स्थिती सध्या चांगलीच वाईट झाली आहे. तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे या भागातील महामार्ग जागोजागी उखडून गेला आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, की ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर मार्गाची २००७ मध्ये बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) मार्फत बांधणी झाली होती. २०११ मध्ये हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. तत्कालीन कामाच्या दर्जामुळे दगदलपूर ते निजामाबाद हा जवळपास ६०० किलोमीटरचा मार्ग आजही तग धरून आहे. परंतू राजीवनगर ते कोत्तापल्ली, वडधमपर्यंतचा महाराष्ट्राच्या हद्दीतील जवळपास २६ किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी उखडून गेला आहे.३५ टन वजन सहन करणाºया या मार्गावर मेडीगड्डा प्रकल्पाचे ७० टन वजनापर्यंतचे ट्रक बिनदिक्कतपणे अहोरात्र चालत आहेत. त्या भागातील रस्ता एवढे वजन सहन करू शकत नसल्याने उखडून जाऊन जागोजागी खड्डेमय झाला आहे. याचा त्रास गडचिरोली जिल्ह्यातील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.सिरोंचा शहरानजिक गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पाच्या कामावरील जड वाहनांची वर्दळ सतत या रस्त्यावरून सुरू असते. रस्त्यावरून उडणारी धूळ आणि खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन बºयाच लोकांना जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले. पण रस्त्याच्या दुरूस्तीसाठी किंवा जड वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांत कोणीही पुढाकार घेतला नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरूस्ती होण्याची शक्यता कमीच आहे.दुरुस्तीचा खर्च मेडीगड्डा प्रकल्पाने द्यावाविशेष म्हणजे याच मेडीगड्डा प्रकल्पाची जड वाहने तेलंगणा राज्यातूनही साहित्याची वाहतूक करतात. पण तेलंगणाच्या हद्दीत त्या वाहनांसाठी गुळगुळीत रस्ते बनविण्यात आले आहेत. मेडीगड्डा प्रकल्पाची वाहने जात असलेला एकही रस्ता तेलंगणाच्या हद्दीत खराब अवस्थेत दिसत नाही. मग महाराष्ट्राच्या हद्दीतील रस्त्यांसाठीच भेदभाव का? असा प्रश्न या भागातील नागरिक करीत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी कोणत्याही उपयोगाच्या नसलेल्या या प्रकल्पाने या भागातील चांगले रस्तेही खराब करून अनेकांचा बळी घेतल्याने या रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च मेडीगड्डा प्रकल्पाकडूनच वसूल करावा, अशीही मागणी काही सूज्ञ नागरिकांनी केली आहे.मेडीगड्डा प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे हा रस्ता जास्त खराब झाला आहे. या प्रकल्पाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी तात्पुरते खड्डे बुजवून त्यांच्या वाहनांची सोय केली होती. परंतू रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे त्याच्या पुनर्बांधणीची गरज आहे. या कामाला शासनाकडून मंजुरीही मिळाली आहे. निवडणूक आचारसंहितेनंतर त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल.- अतुल मेश्राम,कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग विभाग