शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बंद हातपंपांमुळे दुसऱ्या जलस्रोतांवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST

नगर परिषदेची निर्मिती हाेऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला. मात्र शहरात साेयी-सुविधा वाढल्या नाहीत. आजही अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता ...

नगर परिषदेची निर्मिती हाेऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला. मात्र शहरात साेयी-सुविधा वाढल्या नाहीत. आजही अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. बऱ्याच हातपंपांना पुरेसे पाणी येत नाही. त्यातल्या त्यात अधूनमधून अनेक कारणाने नळयोजना बंद पडत असल्याने, उन्हाळ्यात पाण्याची अडचण भासतेच; पण हिवाळा आणि पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील किल्ल्याजवळ जिल्हा परिषद शाळेला लागून असलेला हातपंप पूर्णत: जीर्ण व भंगार झाला आहे. अनेकदा मुले येथे दगड व माती टाकतात, अशी अवस्था झाली असतानासुद्धा नगर पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. हातपंपाची लवकर दुरुस्ती न केल्यास संबंधित सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे.

बाॅक्स

नगरसेवकांच्या सूचनांची दखलच नाही

शहरातील समस्या साेडविण्याबाबत वारंवार प्रशासनाला सूचना केल्या. परंतु, दुर्लक्षच झाले. येथील जलस्रोतांमध्ये वेळेवर ब्लिचिंग टाकले जात नाही. काही बोअरवेल फार जुने असल्याने त्यात गाळ जमा झाला आहे. झरे बुजल्याने बोअरवेल फ्लशिंग करण्यासाठी या सूचना केल्या होत्या; पण त्याकडेही दुर्लक्षच झाले. वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने पाण्याची टाकी भरत नाही. पिण्याचे पाणी ३ ते ४ दिवस मिळत नाही. यासाठी साैरपंप लावावे, अशी सूचना केली. परंतु, त्याकडेही दुर्लक्षच झाले, असे मिलिंद खाेब्रागडे यांनी म्हटले आहे. पाण्याची समस्या असतानाही बंद पडलेले हातपंप दुरुस्त केले जात नसल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

240921\45041931-img-20210924-wa0003.jpg

आरमोरी शहरातील नादुरुस्त असलेले हातपंप