शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: June 14, 2014 02:20 IST

आरमोरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या वडधा परिसरातील गावांमधील ग्रामसेवक, पटवारी, प्राथमिक शिक्षक

वडधा : आरमोरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या वडधा परिसरातील गावांमधील ग्रामसेवक, पटवारी, प्राथमिक शिक्षक व विविध कार्यकारी संस्थांचे कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरामध्ये राहून सेवा देत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे शासकीय काम होण्यास अडथळा निर्माण होत आहे. सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. खरीप हंगामाच्या कामांना सुरूवात झाली आहे. शेतकरी वर्ग बियाणे, खते घेण्यासाठी बाहेर पडत आहे. मात्र खिशात पैसा नसल्याने एखाद्या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी त्याची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. राष्ट्रीयकृत बँका दाखले जमा केल्याशिवाय कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडचे दाखले गोळा करण्यासाठी जात आहेत. शेतकऱ्यांचा हंंगाम सुरू झाला असला तरी याचे काहीही लेनदेण ग्रामसेवक व तलाठ्याला नाही. त्यांचे उशिरा येणे व लवकर जाणे सुरूच आहे. हे कर्मचारी कधी येतात व कधी जातात याचा पत्ताच लागत नाही. एखाद्या ग्रामसेवक किंवा तलाठ्याला दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास तालुकास्थळी मिटींग आहे, हे ठरलेले उत्तर देण्यात येते. त्यामुळे अत्यंत गरजू असलेल्या व्यक्तीला दिवसभर कार्यालयासमोर बसून संबंधित कर्मचाऱ्याची वाट पाहल्याशिवाय पर्याय राहत नाही. या पद्धतीमुळे पाच दाखले गोळा करण्यासाठी १० दिवसापेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने कर्ज मंजूर होण्यास उशिर होत आहे. महत्वाचे म्हणजे यातील एकही कर्मचारी मुख्यालयी न राहताही मुख्यालयी राहत असल्याचे बनावट दाखले जोडून मुख्यालयी राहत असल्याचा घरभाडा उचलत आहेत. यामध्ये काही वाटा वरिष्ठांचाही राहत असल्याने वरिष्ठ सुद्धा याबद्दल कोणतीही कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येते. १२ वीचा निकाल लागला आहे. जात प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्र काढण्यासाठी वडिलाच्या टि. सी. ची गरज भासते. त्याचबरोबर काही विद्यार्थी शाळा बदलवित असल्याने त्यांनाही टि. सी. ची आवश्यकता आहे. मात्र गुरूजीही शहरातूनच ये-जा करत असल्याने ते सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. मुख्यालयी न राहता, मुख्यालयाचा भत्ता उचलण्यात गुरूजीसुद्धा मागे नाही. त्यामुळे गुरूजीवरही कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. मुख्यालयी न राहताही मुख्यालयाचा भत्ता उचलला जात असल्याने शासनाची कोट्यवधी रूपयाची लूट होत आहे. (वार्ताहर)