शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वणव्याने बोरी जंगलाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 01:44 IST

तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोरी जंगल परिसरात कक्ष क्र. २९७ मध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली.

लगामचे कार्यालय कुलूपबंद : लाखोंची वनसंपदा जळून खाकअहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोरी जंगल परिसरात कक्ष क्र. २९७ मध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यामुळे जंगलाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र लगाम येथील वनपाल कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. वन विभागाच्या या बेजबाबदार कारभाराविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गुरूवारी सकाळीच बोरी परिसरातील जंगलाला आग लागली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आगीने उग्र स्वरूप धारण केल्याने जंगलाला वणवा लागला असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. वणव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने वणवा वाढतच चालला होता. दरम्यान, वन्यप्रेमी संघटनेचे प्रमुख रामू मादेशी, वैशाली वाढणकर, माजी सरपंच लालू करपेत हे वणव्याची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष लगाम येथील वनपाल कार्यालयात गेले असता, कार्यालयाला कुलूप लावून असल्याचे आढळून आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, कार्यालय बंद असल्याचे नेमके कारण सांगल्यास असमर्थतता दर्शविली. वणव्याची माहिती आलापल्लीचे उपवनसंरक्षक एच. के. मीना यांनाही वॉटस्अ‍ॅपवरून देण्यात आली. बोरी जंगलात सागवानाची वृक्ष आहेत. या आगीमध्ये अनेक लहान रोपटे जळून खाक झाली. त्याचबरोबर पावसाळ्यात उन्मळून पडलेले वृक्ष सुद्धा या आगीमध्ये जळाले. परिणामी वन विभागाचेही लाखो रूपयांचे नुकसान झाले. उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने जंगलाला आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडणार आहेत. मात्र या आगीला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाने सतर्क असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र वन विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे आग कुठे लागली याची माहिती वन विभागाला वेळीच मिळत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे, आंदोलनाचाही इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)जंगलात नियमित गस्त आवश्यकपुढील महिन्यात मोहफुलाचा हंगाम सुरू होत आहे. मोहफूल विकण्यासाठी जागा साफ करण्यासाठी अनेक नागरिक मोहफुलाच्या झाडाखाली आग लावतात. पुढे ही आग जंगलभर पसरते. त्याचबरोबर तेंदूपत्त्याच्या हंगामादरम्यानही जंगलांना आगी लावण्याच्या घटना नियमितपणे घडतात. त्यामुळे वन विभागाने आता विशेष सतर्क राहून जंगलात नियमितपणे गस्त घालणे आवश्यक आहे. प्रत्येक गावातील नागरिकाला वनपाल किंवा वनरक्षकाने स्वत:चा दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवल्यास नागरिक याबद्दलची माहिती संबंधित वन कर्मचाऱ्याला देतील. वन विभागाच्या सहकार्याने सदर आग वेळीच आटोक्यात आणणे या उपायांमुळे शक्य होणार आहे.