शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

वणव्याने बोरी जंगलाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 01:44 IST

तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोरी जंगल परिसरात कक्ष क्र. २९७ मध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली.

लगामचे कार्यालय कुलूपबंद : लाखोंची वनसंपदा जळून खाकअहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोरी जंगल परिसरात कक्ष क्र. २९७ मध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यामुळे जंगलाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र लगाम येथील वनपाल कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. वन विभागाच्या या बेजबाबदार कारभाराविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गुरूवारी सकाळीच बोरी परिसरातील जंगलाला आग लागली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आगीने उग्र स्वरूप धारण केल्याने जंगलाला वणवा लागला असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. वणव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने वणवा वाढतच चालला होता. दरम्यान, वन्यप्रेमी संघटनेचे प्रमुख रामू मादेशी, वैशाली वाढणकर, माजी सरपंच लालू करपेत हे वणव्याची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष लगाम येथील वनपाल कार्यालयात गेले असता, कार्यालयाला कुलूप लावून असल्याचे आढळून आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, कार्यालय बंद असल्याचे नेमके कारण सांगल्यास असमर्थतता दर्शविली. वणव्याची माहिती आलापल्लीचे उपवनसंरक्षक एच. के. मीना यांनाही वॉटस्अ‍ॅपवरून देण्यात आली. बोरी जंगलात सागवानाची वृक्ष आहेत. या आगीमध्ये अनेक लहान रोपटे जळून खाक झाली. त्याचबरोबर पावसाळ्यात उन्मळून पडलेले वृक्ष सुद्धा या आगीमध्ये जळाले. परिणामी वन विभागाचेही लाखो रूपयांचे नुकसान झाले. उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने जंगलाला आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडणार आहेत. मात्र या आगीला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाने सतर्क असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र वन विभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे आग कुठे लागली याची माहिती वन विभागाला वेळीच मिळत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे, आंदोलनाचाही इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)जंगलात नियमित गस्त आवश्यकपुढील महिन्यात मोहफुलाचा हंगाम सुरू होत आहे. मोहफूल विकण्यासाठी जागा साफ करण्यासाठी अनेक नागरिक मोहफुलाच्या झाडाखाली आग लावतात. पुढे ही आग जंगलभर पसरते. त्याचबरोबर तेंदूपत्त्याच्या हंगामादरम्यानही जंगलांना आगी लावण्याच्या घटना नियमितपणे घडतात. त्यामुळे वन विभागाने आता विशेष सतर्क राहून जंगलात नियमितपणे गस्त घालणे आवश्यक आहे. प्रत्येक गावातील नागरिकाला वनपाल किंवा वनरक्षकाने स्वत:चा दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवल्यास नागरिक याबद्दलची माहिती संबंधित वन कर्मचाऱ्याला देतील. वन विभागाच्या सहकार्याने सदर आग वेळीच आटोक्यात आणणे या उपायांमुळे शक्य होणार आहे.