शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो ; वनतस्करी वाढली

By admin | Updated: March 28, 2017 00:39 IST

वन विभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.

कारवाईची मागणी : बहुतांश कर्मचारी गडचिरोली, मूलवरून करतात ये-जामुरूमगाव : वन विभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. मात्र येथील बहुतांश वनकर्मचारी निवासस्थानी न राहता मूल, गडचिरोली, धानोरा, चंद्रपूर, आरमोरी, कुरखेडा यासारख्या शहराच्या ठिकाणावरून ये-जा करतात. जंगलाची तस्करी रात्रीच होते. मात्र कर्मचारी मुख्यालयी व कर्तव्यावर राहत नसल्याची बाब तस्करांना चांगल्या पद्धतीने ठाऊक असल्याने वनतस्करीचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. मुरूमगाव परिसरातील बहुतांश गावे जंगलांनी वेढले आहेत. येथील एकूण वन जमिनीच्या सुमारे ९० टक्के जमीन जंगलाने व्यापली आहे. त्यामुळेच मुरूमगाव वनपरिक्षेत्र कार्यालय दोन विभागात विभागण्यात आले आहे. मुरूमगाव पूर्व व पश्चिम असे दोन रेंज आहेत. जंगलाच्या संरक्षणासाठी शेकडो वनकर्मचारी व वनाधिकारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजाविता यावे, यासाठी सुस्थितीतील निवासस्थाने बांधून दिली आहेत. मात्र या ठिकाणी काही निवडक वनकर्मचारी राहतात. इतर वनकर्मचारी दुसऱ्या गावावरून ये-जा करतात. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहणे सक्तीचे असले तरी मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील बहुतांश वनकर्मचारी हा नियम धाब्यावर बसवित ये-जा करीत आहेत. मुरूमगाव ते गडचिरोलीचे अंतर जवळपास ६० किमी आहे. गडचिरोलीवरून मूल ५० किमी, आरमोरी ३० किमी अंतरावर आहे. म्हणजेच वन विभागाचे कर्मचारी जवळपास १०० किमी अंतरावरून ये-जा करतात. दुपारी १२ ते १ वाजता कर्तव्यावर पोहोचतात व दुपारी ३ ते ४ वाजताच जाण्याची तयारी सुरू करतात. सुट्या लागून आल्यानंतर एक दिवस अगोदर व नंतर ते आपल्या कर्तव्यावर येत नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे मुरूमगाव परिसरात मागील काही दिवसांपासून खुलेआम लाकडांची तस्करी केली जात आहे. मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.वनव्यावर नियंत्रण राहणार कसे?वनव्यामध्ये कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होते. उन्हाळ्यामध्ये वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. वनवा लागल्यानंतर नागरिक याबाबतची माहिती संबंधित वनरक्षक किंवा वनपालाला देतात. दरवेळी सदर वनरक्षक किंवा वनपाल मुख्यालय सोडून गडचिरोली किंवा मूलमध्ये आहे, असे सांगतो. त्यावेळी नागरिकही हतबल होतात. वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच मुरूमगाव वनपरिक्षेत्रात दरवर्षी आगी लागण्याचे प्रमाण इतर वनपरिक्षेत्रांच्या तुलनेत वाढले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.