शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

वनकर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो ; वनतस्करी वाढली

By admin | Updated: March 28, 2017 00:39 IST

वन विभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.

कारवाईची मागणी : बहुतांश कर्मचारी गडचिरोली, मूलवरून करतात ये-जामुरूमगाव : वन विभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. मात्र येथील बहुतांश वनकर्मचारी निवासस्थानी न राहता मूल, गडचिरोली, धानोरा, चंद्रपूर, आरमोरी, कुरखेडा यासारख्या शहराच्या ठिकाणावरून ये-जा करतात. जंगलाची तस्करी रात्रीच होते. मात्र कर्मचारी मुख्यालयी व कर्तव्यावर राहत नसल्याची बाब तस्करांना चांगल्या पद्धतीने ठाऊक असल्याने वनतस्करीचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. मुरूमगाव परिसरातील बहुतांश गावे जंगलांनी वेढले आहेत. येथील एकूण वन जमिनीच्या सुमारे ९० टक्के जमीन जंगलाने व्यापली आहे. त्यामुळेच मुरूमगाव वनपरिक्षेत्र कार्यालय दोन विभागात विभागण्यात आले आहे. मुरूमगाव पूर्व व पश्चिम असे दोन रेंज आहेत. जंगलाच्या संरक्षणासाठी शेकडो वनकर्मचारी व वनाधिकारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजाविता यावे, यासाठी सुस्थितीतील निवासस्थाने बांधून दिली आहेत. मात्र या ठिकाणी काही निवडक वनकर्मचारी राहतात. इतर वनकर्मचारी दुसऱ्या गावावरून ये-जा करतात. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहणे सक्तीचे असले तरी मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील बहुतांश वनकर्मचारी हा नियम धाब्यावर बसवित ये-जा करीत आहेत. मुरूमगाव ते गडचिरोलीचे अंतर जवळपास ६० किमी आहे. गडचिरोलीवरून मूल ५० किमी, आरमोरी ३० किमी अंतरावर आहे. म्हणजेच वन विभागाचे कर्मचारी जवळपास १०० किमी अंतरावरून ये-जा करतात. दुपारी १२ ते १ वाजता कर्तव्यावर पोहोचतात व दुपारी ३ ते ४ वाजताच जाण्याची तयारी सुरू करतात. सुट्या लागून आल्यानंतर एक दिवस अगोदर व नंतर ते आपल्या कर्तव्यावर येत नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे मुरूमगाव परिसरात मागील काही दिवसांपासून खुलेआम लाकडांची तस्करी केली जात आहे. मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.वनव्यावर नियंत्रण राहणार कसे?वनव्यामध्ये कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होते. उन्हाळ्यामध्ये वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. वनवा लागल्यानंतर नागरिक याबाबतची माहिती संबंधित वनरक्षक किंवा वनपालाला देतात. दरवेळी सदर वनरक्षक किंवा वनपाल मुख्यालय सोडून गडचिरोली किंवा मूलमध्ये आहे, असे सांगतो. त्यावेळी नागरिकही हतबल होतात. वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच मुरूमगाव वनपरिक्षेत्रात दरवर्षी आगी लागण्याचे प्रमाण इतर वनपरिक्षेत्रांच्या तुलनेत वाढले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.