शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

विकासासाठी पोलीस विभाग तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 03:08 IST

नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग नेहमी तत्पर आहे.

गडचिरोली : नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग नेहमी तत्पर आहे. आजपर्यंत अनेक बाबींचा पाठपुरावा करण्यात आला आहे व यामाध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागाच्या विकासात भर पडली आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही पोलीस विभागाने पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. पोलीस प्रशासनाच्या वतीने ९ उपविभागीयस्तरावर जनमैत्री मेळावा तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याच धर्तीवर गडचिरोली उपविभागीय कार्यालयाच्या वतीने ९ ते ११ आॅक्टोबर यादरम्यान जनमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला उपस्थित असलेल्या नागरिकांना सोमवारी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, समाजसेवक देवाजी तोफा, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील जनता व पोलीस यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावे, याउद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. तीन दिवसीय मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, शेतीविषयक समस्या, महसूलविषयक माहिती, पेसा कायदा व ग्रामसभेच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मेळाव्याला शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना समाजसेवक देवाजी तोफा यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाचा विकास करण्याचे आवाहन केले. संचालन पीएसआय सतीश शिरसाट तर आभार पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)