शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मद्यसम्राटांची जिल्ह्याच्या सीमेवर नजर

By admin | Updated: March 16, 2015 01:13 IST

लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १ एप्रिलपासून दारूबंदी करण्याची घोषणा शासनाने केली. याबाबत गृह विभागाने १० मार्चला शासन परिपत्रक निर्गमित केले.

देसाईगंज : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १ एप्रिलपासून दारूबंदी करण्याची घोषणा शासनाने केली. याबाबत गृह विभागाने १० मार्चला शासन परिपत्रक निर्गमित केले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यसम्राटांच्या नजरा आता गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात भंडारा, गोंदिया जिल्ह्यावर खिळल्या आहेत. आतापासूनच मद्यसम्राटांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जागेचा व गावाचा शोध घेणे सुरू केले असून जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या हालचाली वाढल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे देसाईगंज तालुक्याला लागून असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूचा महापूर वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होणार असल्याचे परिपत्रक गृह विभागाने निर्गमित केले. या परिपत्रकातून चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यसम्राटांना त्यांचे दारूदुकान कायद्याने दारूबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा सोडून राज्यात इतरत्र कुठेही प्रचलित नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून सुरू ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असा दिलासाही दिला आहे. गडचिरोली जिल्ह्याची सीमा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर, सोनी (चपराड) व गोंदिया जिल्ह्यातील अरूणनगर, महागाव, सिरोली, मांडोखाल व अर्जुनी-मोरगाव या गावाला लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काही मद्यसम्राटांनी वणी शहराकडे दारू दुकाने थाटण्याच्या हालचाली वाढविल्या आहेत. मात्र वणी शहरात दारू दुकानांची गर्दी वाढून जमिनी कमी पडत आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील काही मद्यसम्राटांनी आपले दारू दुकान लावण्यासाठी आता गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा भागात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात हालचाली वाढविल्या आहेत. चंद्रपुरातील मद्यसम्राटांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे प्रथम अर्ज करावे लागणार आहे. त्यात त्यांची अनुज्ञपी कोणत्या जिल्ह्यात सुरू करणार याबाबत त्यांना उल्लेख करावा लागणार आहे. हे अर्ज आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर त्यांना ते आपल्या अभिप्रायासह अंतिम आदेशासाठी शासनाकडे पाठवावे लागणार आहे. वर्धा, गडचिरोली व त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होत असल्याने मद्यसम्राट गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. इतर जिल्हे मद्यसम्राटांना दूर पडतात. त्यामुळे मद्यसम्राट गोंदिया व भंडारा जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविणार असल्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)