शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Lok Sabha Election 2019; ग्रामीण मतदार म्हणतात, काँग्रेसच्याच काळात अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:44 IST

लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ही बाब डॉ.नामदेव उसेंडी यांना फायद्याची ठरत आहे.

ठळक मुद्देउसेंडींना ग्रामसस्थांची साथ मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ही बाब डॉ.नामदेव उसेंडी यांना फायद्याची ठरत आहे.जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामसभांच्या भागात शेतकरी कामगार पक्षासोबत काँग्रेस विचारसरणीचे लोक जास्त आहेत. काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले प्राबल्य असलेल्या भागात काँग्रेससाठी जोर लावला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी गावागावात संघटन वाढवून आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचा फायदा काँग्रेस आघाडीचे ुउमेदवार डॉ.उसेंडी यांना होणार आहे.विशेष म्हणजे ग्रामसभांच्या क्षेत्रातही शेकापचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन करून मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यात हे नेते बऱ्यापैकी यशस्वी होत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात अद्याप कोणत्याही पक्षाचे नेते पोहोचले नाही. नक्षलवाद्यांची दहशत हे त्यामागील एक कारण आहे. परंतू आधीपासून दुर्गम भागातही संपर्क ठेवून असणाºया पक्षांचा प्रभाव तेथील नागरिकांवर कायम आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागातील नागरिक काँग्रेस आघाडीच्या बाजुने राहिल्यास डॉ.उसेंडी यांना लाभ होईल.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर