शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2019; दुर्गम भागापासून उमेदवार दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:43 IST

गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास निम्मा भाग दुर्गम क्षेत्रात मोडतो. या परिसरात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. अनेक गावांना जाण्यासाठी रस्तेसुध्दा नाहीत. त्यामुळे त्या भागापर्यंत अजुन कोणतेच उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील उमेदवार कोण? असा प्रश्न छत्तीसगड, तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्दे५०० किमीचा विस्तार : लोक विचारतात, उमेदवार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास निम्मा भाग दुर्गम क्षेत्रात मोडतो. या परिसरात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. अनेक गावांना जाण्यासाठी रस्तेसुध्दा नाहीत. त्यामुळे त्या भागापर्यंत अजुन कोणतेच उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील उमेदवार कोण? असा प्रश्न छत्तीसगड, तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना पडला आहे.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा विस्तार सिरोंचा तालुक्यापासून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यापर्यंत ५०० किमीच्या घरात आहे. प्रत्येक गावात उमेदवाराला पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे कार्यकर्ते पोहोचतील, याची व्यवस्था केली जात आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यापैकी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील काही विधानसभा क्षेत्र दुर्गम भागात मोडतात. त्या भागात लोकसंख्या अतिशय विरळ आहे. चार ते पाच किमी अंतरावर ९ ते १० कुटुंबाची लोकसंख्या असलेले गाव आढळते. त्याचबरोबर काही गावांना जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे त्या गावांना भेट देण्यापेक्षा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील गावांना भेटी देण्यास प्राधान्य दिले जात आहे. या क्षेत्रांमध्ये दर दोन ते तीन किमी अंतरावर १०० ते २०० कुटुंबांची लोकसंख्या असलेले गाव मिळते. या गावांमध्ये पोहोचून प्रचार केल्यास कमी कालावधीत जास्त लोकांकडे पोहोचता येते. प्रचाराच्या या गणितात गडचिरोली जिल्हा मागे पडला असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना फोन करून संबंधित गावांमध्ये फिरण्याचे निर्देश उमेदवार देत आहेत.दुर्गम भागातील काही गावांमध्ये वृत्तपत्र पोहोचत नाही. त्यामुळे नेमका कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, हे त्यांना सुध्दा माहीत नाही. त्यामुळे ऐनवेळेवर कोणत्याही उमेदवाराला मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावर्षी तरी उमेदवार आपल्या गावांपर्यंत पोहोचून आपल्या समस्या जाणून घेतील, अशी अपेक्षा दुर्गम भागातील नागरिकांना होते. मात्र आता प्रचारासाठी केवळ आठ ते नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे दुर्गम गावांपर्यंत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते पोहोचण्याची शक्यता कमीच आहे.समस्यांच्या पाढ्यांनी कार्यकर्ते निरूत्तरज्या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, त्या गावात इतर सोयीसुविधा असतील काय? याचा विचार न केलेलाच बरा. अशा गावांमध्ये उमेदवार पोहोचू शकत नसल्याने कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रचार करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. कार्यकर्ता गावात मत मागण्यासाठी गेल्यानंतर त्याला गावातील समस्यांचा पाढा वाचवून दाखविला जात आहे. पाच वर्ष उलटूनही निवडून आलेले लोक आमच्या गावाला येत नाही. त्यांचे तर सोडाच मतदानाचा दिवस उलटल्यानंतर तुम्ही कार्यकर्तेही आमच्या गावाकडे फिरकून बघत नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावकऱ्यांचे प्रश्न बघून नेमके कोणते उत्तर द्यावे, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.कोण आहे उमेदवार?छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकसंख्या विरळ असल्याने उमेदवार या गावांमध्ये प्रचार करण्याकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावापर्यंत पोहोचत नाही. अनेक गावातील नागरिकांना आपल्या भागात लोकसभेचे उमेदवार कोण-कोण रिंगणात आहेत, हे सुध्दा माहित नसल्याची स्थिती आहे.