शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; ६५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गुरूवारी नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नक्षल दहशत असूनही मतदार संघाची मतदानाची टक्केवारी ६५ पेक्षा जास्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदान झाले होते.

ठळक मुद्देदुर्गम भागात मतदानात अडथळेनवमतदारांसह भर उन्हात वृद्धांनीही बजावला मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गुरूवारी नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नक्षल दहशत असूनही मतदार संघाची मतदानाची टक्केवारी ६५ पेक्षा जास्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. दरम्यान मतदानात अडथळे आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी दोन दिवसात तीन भूसुरूंग स्फोट घडविण्यासोबतच गुरूवारी पोलिसांवर फायरिंगही केली. या घटनांमध्ये दोन जवान जखमी झाले आहेत.या निवडणुकीत भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे या पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. येत्या २३ मे रोजी एकाच वेळी सर्व ठिकाणची मतमोजणी होणार आहे. त्यामळे मतदारांना निकालासाठी तब्बल सव्वा महिना वाटप पहावी लागणार आहे.सकाळी ७ वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. परंतू शहरी भागात ३ वाजताही मतदारांच्या रांगा लागलेल्या असल्याने त्यांना मतदान केंद्राच्या प्रांगणात घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. त्यांचे मतदान पूर्ण होण्यास ५ वाजले. विशेष म्हणजे नवमतदारांमध्ये यावेळी मतदानाचा विशेष उत्साह दिसून आले. पहिल्यांदा मतदान करताना ते चांगलेच उत्साही दिसत होते.गडचिरोलीतील सखी मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यापासून तर केंद्राधिकारी व इतर कर्मचारी महिलाच होत्या. पंचायत समितीच्या आवारात असलेल्या या केंद्रात लोकमतची चमू पोहोचली त्यावेळी एक पुरूष कर्मचारीही तिथे होता. महिला शिपायाच्या सोबतीला दोन पुरूष होमगार्डही होते. त्यामुळे सबकुछ महिला हे चित्र दिसून आले नाही.गडचिरोली शहरात जवळपास तीन मतदान केंद्र एकाच शाळेत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मात्र मतदान केंद्रावर अपुºया सोयीसुविधा असल्याने याचा त्रास मतदारांना सहन करावा लागला. काही ठिकाणी पाण्याच्या कॅनही संपल्या होत्या.कडक ऊन तापत असल्याने मतदान केंद्राच्या परिसरात पेंडॉल टाकणे आवश्यक होते. काही मतदान केंद्रांवर पेंडाल टाकण्यात आले. मात्र सदर पेंडाल अपुरे पडत होते. तीन मतदान केंद्रामधील मतदार एका ठिकाणी जमा झाल्याने मोठी गर्दी झाली होती. काही मतदान केंद्रांवरील पाणी सकाळी ११ वाजताच संपले. त्यानंतर मात्र थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे मतदार पुन्हा घरी जाऊन पाण्याच्या बॉटल आणत होते.वयोवृध्द मतदार रांगेतचवयोवृध्द तसेच गरोदर मातांना रांगेत उभे न करता त्यांना सरळ मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे न्यावे, त्यांना प्राधान्याने मतदान करू द्यावे, असे निर्देश निवडणूक विभागाचे आहे. याबाबत बरीच जनजागृती सुध्दा करण्यात आली. मात्र काही नागरिक व कर्मचारी सुध्दा या नवीन नियमाबाबत अनभिज्ञ होते. त्यामुळे वृध्द व गरोदर महिलाही रांगेत लागल्या असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत होते.ऐन वेळेवर मतदान केंद्र बदललेकोरची : तालुक्यातील संवेदनशील गावांमधील मतदान केंद्र ऐनवेळेवर बदलविण्यात आले. त्यामुळे मतदारांची चांगलीच गैरसोय झाली. तालुक्यातील भीमनखुजी मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरने मतदानाची पार्टी पाठविण्यात आली होती. पण सदर केंद्र अतिसंवेदनशील असल्याच्या कारणावरून १५ किमी अंतरावरील ग्यारापत्ती येथे केंद्र हलविण्यात आले. नाडेकल येथील मतदान केंद्र १४ किमी अंतरावरील ढोलडोंगरी येथे हलविले. लेकुरबोडीचा मतदान केंद्र ३किमी अंतरावरील नवेझरी येथे हलविले. आलोंडीचा मतदान केंद्र ५ किमी अंतरावरील पिटेसूर येथे हलविले. गोडरीचा केंद्र ७ किमी अंतरावरील सोनपूर येथे हलविले. सावली येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र प्रभूदास लाडे यांच्या घरी हलविण्यात आले. त्यांच्या घरी नुकताच लग्नाचा कार्यक्रम पार पडला होता. लग्नाच्या मंडपातच मतदान केंद्र सुरू केले. सुरक्षेच्या कारणास्तव सदर मतदान केंद्र हलविण्यात आले. मात्र मंडपात कोणती सुरक्षा होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कैमुल येथील जि. प. शाळेतील मतदान केंद्र सुदाराम मेश्राम यांच्या घरी हलविले. सावली व तैमुल येथील नागरिकांना विचारपूस केली असता, यापूर्वीच्या निवडणुका शाळेतच झाल्याचे सांगितले.भाडभिडीत दीड तास उशिरा मतदान सुरूघोट : भाडभिडी मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या नियोजित वेळेवर पोहोचल्या. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात होणार होती. मात्र ईव्हीएमचे कनेक्शन लूज होते. झोनल आॅफिसरने मशीन बदलवून दिल्यानंतर ९ वाजताच्या दरम्यान मतदान सुरू झाले. भाडभिडी केंद्रावर बिलासपूर, भाडभिडी, राजूर बू., राजूर खुर्द, जानाळा, जंगमपूर, लभानतांडा या सात गावांचा समावेश होता. या मतदान केंद्रांवर एकूण १ हजार ७५ मतदार होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019