शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

पाण्यासाठी कुलूप ठोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:34 IST

आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील ईटियाडोह कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देइटियाडोहचे पाणी मिळणार : शिवसैनिक व शेतकरी आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील ईटियाडोह कार्यालयाला कुलूप ठोकले.जोपर्यंत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने शेवटी २० सप्टेंबरला सायंकाळपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणार, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. पावसाने दडी मारल्यामुळे आरमोरी, अरसोडा, कासवी, आष्टा, अतरंजी, वघाळा, पालोरा या गावातील शेतकºयांचे धानपीक पाण्याअभावी करपायला लागले. सदर गावातील शेतकऱ्यांना निस्तार हक्काद्वारे ईटियाडोहाचे पाणी लागू आहे.इटियाडोह कार्यालयाच्या सहायक अभियंत्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हरीष मने यांच्या नेतृत्वात इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन केले. या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून २० सप्टेंबर सायंकाळपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी आ.डॉ.रामकृष्ण मडावी, राजू अंबानी, ज्ञानेश्वर ढवगाये, प्रेमनाथ बेहरे, धकाते, महेंद्र शेंडे, शरद भोयर, विनायक गोंधोळे, दीपक भोयर, भाऊराव बोरकर, मनोज सपाटे, कमलाकर चाटारे, राजेंद्र दिवटे, अंकुश खरवडे, दोनाडकर, धर्मा धकाते, राजू पुसे, नानू वांढरे, राजू उपासे, रवी भोयर, तलाठी दोनाडकर, अशोक ठाकरे यांच्यासह अतरंजी, आष्टा, वघाळा, अरसोडा, कासवी, पालोरा आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.