शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पाण्यासाठी कुलूप ठोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:34 IST

आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील ईटियाडोह कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देइटियाडोहचे पाणी मिळणार : शिवसैनिक व शेतकरी आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात आरमोरी येथील ईटियाडोह कार्यालयाला कुलूप ठोकले.जोपर्यंत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने शेवटी २० सप्टेंबरला सायंकाळपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणार, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. पावसाने दडी मारल्यामुळे आरमोरी, अरसोडा, कासवी, आष्टा, अतरंजी, वघाळा, पालोरा या गावातील शेतकºयांचे धानपीक पाण्याअभावी करपायला लागले. सदर गावातील शेतकऱ्यांना निस्तार हक्काद्वारे ईटियाडोहाचे पाणी लागू आहे.इटियाडोह कार्यालयाच्या सहायक अभियंत्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हरीष मने यांच्या नेतृत्वात इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन केले. या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून २० सप्टेंबर सायंकाळपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी आ.डॉ.रामकृष्ण मडावी, राजू अंबानी, ज्ञानेश्वर ढवगाये, प्रेमनाथ बेहरे, धकाते, महेंद्र शेंडे, शरद भोयर, विनायक गोंधोळे, दीपक भोयर, भाऊराव बोरकर, मनोज सपाटे, कमलाकर चाटारे, राजेंद्र दिवटे, अंकुश खरवडे, दोनाडकर, धर्मा धकाते, राजू पुसे, नानू वांढरे, राजू उपासे, रवी भोयर, तलाठी दोनाडकर, अशोक ठाकरे यांच्यासह अतरंजी, आष्टा, वघाळा, अरसोडा, कासवी, पालोरा आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.