शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कत्तलीसाठी नेणाºया ६० जनावरांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:55 IST

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून चंद्रपूर येथे कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारे दोन ट्रक देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला गावाजवळ अडवून ६० जनावरांची सुटका केली आहे.

ठळक मुद्देतिघांना अटक : मोहटोला गावाजवळ कारवाई; दोन ट्रकने केली जात होती वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हाळा/मोहटोला : गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून चंद्रपूर येथे कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारे दोन ट्रक देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला गावाजवळ अडवून ६० जनावरांची सुटका केली आहे. सदर कारवाई ८ आॅक्टोबरच्या रात्री २ वाजता करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.दोन ट्रकमध्ये जनावरांना कोंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी यांना प्राप्त झाली. त्यानुसार रमाकांत ठेंगरी, हिरालाल शेंडे व इतर चौघांनी किन्हाळा/मोहटोला गावाजवळ पाळत ठेवून ट्रक अडविले. ट्रकची पाहणी केली असता, एमएच-३४-एव्ही-०५१८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ३९ जनावरे कोंबून ठेवण्यात आली होती. तर एमएच-३४-एव्ही-१२०५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २१ जनावरे आढळून आली. या सर्व जनावरांची अंदाजीत किंमत १४ लाख ३० हजार रूपये एवढी होते. दोन ट्रकही पोलिसांनी जप्त केली असून ट्रकची किंमत १० लाख रूपये एवढी होते.ट्रक पकडल्यानंतर याबाबतची माहिती देसाईगंज पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शेख फारूख शेख नासीर (२६) रा. बल्लारपूर, ऐजाज सुलेमान खान (३४) रा. गडचांदूर, शेख सद्दाम शेख कदीर (२०) रा. बल्लारपूर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर जनावरे कोंढाळा व जुनी वडसा येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत. जनावरांची सुटका करण्याच्या कामात किन्हाळा/मोहटोला ग्रामपंचायतीचे सरंपच हिरालाल शिंदे, वसंता दोनाडकर, नवलाजी मेश्राम, रवींद्र उरकुडे, सूरज लोथे, विनोद ठेंगरे, अरविंद घुटके यांनी सहकार्य केले.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रवींद्र कुळमेथे करीत आहेत.