शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साक्षर भारत अभियान : हजारो नागरिक झाले साक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:23 IST

साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.निरक्षर व्यक्तीला दैनंदिन व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशातील एकही व्यक्ती निरक्षर राहू नये, एवढेच नव्हे तर वयोवृध्द नागरिकाला सुध्दा वाचता, लिहिता यावे, यासाठी भारत सरकारने ‘साक्षर भारत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन प्रेरक नेमण्यात आले आहेत. सदर प्रेरक गावातील नागरिकांना शिकविण्याचे काम करतात. या प्रेरकांना मासिक दोन हजार रूपये मानधन शासनाकडून दिले जाते. मार्च व आॅगस्ट महिन्यात वर्षातून दोन वेळा दरवर्षी निरक्षरांची परीक्षा घेतली जाते.यावर्षी आॅगस्ट महिन्याच्या शेवटी परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हाभरातील ७ हजार ३४७ नागरिकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ७ हजार १५९ नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर पेपर तपासणीसाठी डायटकडे पाठविण्यात आले आहेत. डायट स्तरावर या प्रश्नपत्रिकांची तपासणी झाल्यानंतर प्रत्येक परीक्षार्थीला पडलेले गुण जिल्हास्तरावरील निरंतर शिक्षण विभागाकडे तपासण्यासाठी पाठविले जातात. सदर गुण पुणे येथे पाठविले जातात. उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना साक्षर भारत अभियान अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते. गडचिरोली जिल्ह्याची एकूण साक्षरता ७४.४ टक्के आहे. जवळपास अडीच लाख नागरिक अजुनही निरक्षर आहेत. त्यामुळे पाच वर्षाच्या कालावधीनंतरही साक्षर भारत मिशन अंतर्गत परीक्षा देणाºया परीक्षार्थींची संख्या कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे.सात वर्षांत सव्वा लाख नागरिकांची परीक्षामागील सात वर्षांत १ लाख ११ नागरिकांनी परीक्षा देऊन साक्षर होण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी ८ ते १० हजार नागरिक परीक्षा देतात. निरंतर शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये ११ हजार ४०५ नागरिकांनी परीक्षा दिली आहे. २०१२ मध्ये १० हजार ९८४, २०१३ मध्ये २० हजार ४९७, २०१४ मध्ये ६ हजार १५१, २०१५ मध्ये १३ हजार ४३५, २०१६ मध्ये २९ हजार ५६० नागरिकांनी परीक्षा दिली आहे. मार्च २०१७ मध्ये २१ हजार ४७९ नागरिकांनी साक्षरतेची परीक्षा दिली आहे.

प्रेरक नावापुरतेचप्रत्येक प्रेरकाला दोन हजार रूपये मानधन दिले जात आहे. मात्र प्रेरक नागरिकानां न शिकविताच केवळ मानधन लाटत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत.तालुकानिहाय परीक्षार्थीतालुका परीक्षार्थीगडचिरोली ५५७धानोरा ९९०आरमोरी ६२३देसाईगंज ३९४कुरखेडा ७६३कोरची ५२४चामोर्शी ११३६मुलचेरा २९४एटापल्ली ४८६भामरागड २०७अहेरी ५६७सिरोंचा ६१८एकूण ७१५९