शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
4
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
5
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
6
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
7
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
8
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
9
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
12
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
13
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
14
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
17
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
18
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
19
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
20
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल

साक्षर भारत अभियान : हजारो नागरिक झाले साक्षर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:23 IST

साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.निरक्षर व्यक्तीला दैनंदिन व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशातील एकही व्यक्ती निरक्षर राहू नये, एवढेच नव्हे तर वयोवृध्द नागरिकाला सुध्दा वाचता, लिहिता यावे, यासाठी भारत सरकारने ‘साक्षर भारत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन प्रेरक नेमण्यात आले आहेत. सदर प्रेरक गावातील नागरिकांना शिकविण्याचे काम करतात. या प्रेरकांना मासिक दोन हजार रूपये मानधन शासनाकडून दिले जाते. मार्च व आॅगस्ट महिन्यात वर्षातून दोन वेळा दरवर्षी निरक्षरांची परीक्षा घेतली जाते.यावर्षी आॅगस्ट महिन्याच्या शेवटी परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हाभरातील ७ हजार ३४७ नागरिकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ७ हजार १५९ नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर पेपर तपासणीसाठी डायटकडे पाठविण्यात आले आहेत. डायट स्तरावर या प्रश्नपत्रिकांची तपासणी झाल्यानंतर प्रत्येक परीक्षार्थीला पडलेले गुण जिल्हास्तरावरील निरंतर शिक्षण विभागाकडे तपासण्यासाठी पाठविले जातात. सदर गुण पुणे येथे पाठविले जातात. उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना साक्षर भारत अभियान अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते. गडचिरोली जिल्ह्याची एकूण साक्षरता ७४.४ टक्के आहे. जवळपास अडीच लाख नागरिक अजुनही निरक्षर आहेत. त्यामुळे पाच वर्षाच्या कालावधीनंतरही साक्षर भारत मिशन अंतर्गत परीक्षा देणाºया परीक्षार्थींची संख्या कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे.सात वर्षांत सव्वा लाख नागरिकांची परीक्षामागील सात वर्षांत १ लाख ११ नागरिकांनी परीक्षा देऊन साक्षर होण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी ८ ते १० हजार नागरिक परीक्षा देतात. निरंतर शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये ११ हजार ४०५ नागरिकांनी परीक्षा दिली आहे. २०१२ मध्ये १० हजार ९८४, २०१३ मध्ये २० हजार ४९७, २०१४ मध्ये ६ हजार १५१, २०१५ मध्ये १३ हजार ४३५, २०१६ मध्ये २९ हजार ५६० नागरिकांनी परीक्षा दिली आहे. मार्च २०१७ मध्ये २१ हजार ४७९ नागरिकांनी साक्षरतेची परीक्षा दिली आहे.

प्रेरक नावापुरतेचप्रत्येक प्रेरकाला दोन हजार रूपये मानधन दिले जात आहे. मात्र प्रेरक नागरिकानां न शिकविताच केवळ मानधन लाटत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत.तालुकानिहाय परीक्षार्थीतालुका परीक्षार्थीगडचिरोली ५५७धानोरा ९९०आरमोरी ६२३देसाईगंज ३९४कुरखेडा ७६३कोरची ५२४चामोर्शी ११३६मुलचेरा २९४एटापल्ली ४८६भामरागड २०७अहेरी ५६७सिरोंचा ६१८एकूण ७१५९