शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

यादी लाखाेची; उद्दिष्ट मात्र अठराशे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर बांधून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. ‘अ’ व ‘ब’ यादीतील बहुतांश लाभार्थ्यांना घरकुले मिळाली आहेत. चार वर्षांपूर्वी ‘प्रपत्र ड’ ही यादी तयार करण्यात आली हाेती. त्यावेळी घरकुलासाठी इच्छुक असलेल्यांची नावे मागविण्यात आली हाेती. चार वर्षांनंतर परिस्थिती बदलल्याने या यादीत बदल करणे आवश्यक असल्याने नुकत्याच प्रत्येक गावांत ग्रामसभा घेऊन यादी अंतिम तयार करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ‘प्रपत्र ड’ ही यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत लाभार्थ्यांची संख्या लाखाेंच्या घरात आहे. मात्र, जिल्ह्याला वर्षभरात केवळ १ हजार ८२८ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक जणांना पुन्हा पाच वर्षे घरकुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर बांधून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. ‘अ’ व ‘ब’ यादीतील बहुतांश लाभार्थ्यांना घरकुले मिळाली आहेत. चार वर्षांपूर्वी ‘प्रपत्र ड’ ही यादी तयार करण्यात आली हाेती. त्यावेळी घरकुलासाठी इच्छुक असलेल्यांची नावे मागविण्यात आली हाेती. चार वर्षांनंतर परिस्थिती बदलल्याने या यादीत बदल करणे आवश्यक असल्याने नुकत्याच प्रत्येक गावांत ग्रामसभा घेऊन यादी अंतिम तयार करण्यात आली आहे. यादीतील पात्र लाभार्थ्यांची संख्या लाखाेंच्या घरात राहण्याची शक्यता आहे. मात्र दरवर्षी शासन जिल्हाभरात जेमतेम दाेन हजार घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देते. त्यामुळे अनेकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

२०२२ सुरू तरी ८० टक्के कच्ची घरे२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी घाेषणा प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांनी केली हाेती. घरकुलाच्या याेजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रधानमंत्री आवास याेजना सुरू करण्यात आली. मात्र, अजूनपर्यंत २० टक्केही नागरिकांना पक्के घरे मिळाली नाही. ग्रामीण भागांत ८० टक्के घरे कुडामातीची दिसून येतात. 

यादीत नाव असले तरी पाच वर्षकाेणत्या कुटुंबाला प्राधान्याने घरकुल द्यायचे याचे नियम शासनाने ठरवून दिले आहेत. त्यामुळे ‘ड’ यादीत नाव आहे म्हणजे, याचवर्षी घरकुल मिळणार, असे नाही. यादीत जर शेवटचे नाव असेल तर घरकुल मिळण्यासाठी आणखी पाच ते सात वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असा आहे प्राधान्य क्रमविधवा, अपंग, परित्यक्त्या व ज्या कुटुंबात सर्वाधिक सदस्य आहेत अशा कुटुंबांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर इतरांचा क्रमांक लागेल.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना