शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाची यादी जाहीर

By admin | Updated: October 1, 2014 23:23 IST

शाळा महाविद्यालय सुरू होऊनही तीन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. याबाबत सम्यक विद्यार्थी

गडचिरोली : शाळा महाविद्यालय सुरू होऊनही तीन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. याबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ आॅक्टोबर रोजी निदर्शने केली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. पुणे येथील समाजकल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काही तासांच्या आतच सुमारे १४७ विद्यार्थ्यांची यादी घोषित केली आहे. हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे फार मोठे यश आहे. मागास वर्गीय विद्यार्थ्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी प्रत्येक जिल्हास्थळी व काही तालुकास्थळी वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांवर विशेष समाजकल्याण विभागाचे नियंत्रण राहते. वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होईल या अनुषंगाने अनेक गरीब विद्यार्थ्यांनी शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. मात्र यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्याला अक्षम्य दुर्लक्ष झाले. चालू शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरीही वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती नसतांनाही किरायाच्या खोलीमध्ये राहावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. काही विद्यार्थ्यांनी तर शाळा महाविद्यालयांमध्ये येणेच बंद केले होते. यादी तत्काळ जाहिर करण्यात यावी, यासाठी समाज कल्याण विभागाला अनेकवेळा विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. १ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. गडचिरोली येथील विशेष समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधला व सांयकाळ होण्यापूर्वीच वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सुमारे १४७ विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय लवकरच होणार आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक व आर्थिक नुकसान वाचणार आहे. या आंदोलनात संदीप रहाटे, प्रमोद माहोरकर, जितेंद्र वंजारे, अमोल खोब्रागडे, राजू दामले, व्यंकटेश भक्तू, सागर रोकडे, विकेश मडावी, देवेंद्र मेश्राम, प्रितम मेश्राम, राकेश निष्ठुरी, दिलीप नंदेश्वर, महेश निष्ठुरी, पंकज गेडाम, पंकज राऊत, कुणाल दरडे, राकेश तलमले आदी सहभागी झाले होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे विद्यार्थी व पालकांनी कौतूक केले आहे. विशेष म्हणजे जे काम मागील तीन महिन्यांपासून रखडले होते, सदर काम आंदोलनानंतर काही तासांतच पूर्ण झाले आहे. हे आंदोलनकर्त्यांचे फार मोठे यश आहे. (नगर प्रतिनिधी)