शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

धानोरा व आष्टीतील बँक ग्राहकांना लिंकफेलचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा/आष्टी : ५ जुलै रोजी धानोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया व आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती ...

ठळक मुद्देदिवसभर केली प्रतीक्षा । ५० किमी अंतरावरून आलेल्या ग्राहकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा/आष्टी : ५ जुलै रोजी धानोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया व आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची लिंक फेल असल्याने ग्राहकांना बँकेत ताटकळत बसावे लागले.धानोरा येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे. संपूर्ण तालुक्यातील नागरिक याच बँकेत येत असल्याने या बँकेत दिवसभर ग्राहकांची गर्दी राहते. शुक्रवारी सकाळपासूनच बँकेची लिंक फेल असल्याने कोणतेच व्यवहार दिवसभर झाले नाही. लिंक येईल व आर्थिक व्यवहार सुरू होतील, या अपेक्षेने ग्राहक दिवसभर थांबले. मात्र लिंक सुरू झाली नाही. आर्थिक व्यवहारही झाले नाही. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. काही नागरिक पीक कर्जाचे पैसे व इतर कामासाठी बँकेत आले होते. मात्र काम न झाल्याने आल्यापावली परत जावे लागले. एसबीआयचे एटीएम मागील तीन दिवसांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेतच जावे लागत आहे. बँकही काम करीत नसल्याने नागरिक निराश झाले. पेंढरी, कोटगूल, गोडलवाही, मुंगनेर, झाडापापडा या ग्रामीण भागातून अनेक नागरिक पैसे काढण्यासाठी आले होते. काही नागरिक केवायसी फार्म भरणे व इतर कामासाठी थांबले होते. ४० ते ५० किमी वरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.धानोरा तालुक्यात बँकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे ५० ते ६० किमी अंतरावरून नागरिकांना बँक व्यवहारांसाठी धानोरा येथे यावे लागते. विविध योजनांचे पैसे बँकेत जमा केले जातात. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना पैसे काढण्यासाठी धानोरा येथे आल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र लिंक फेल व इतर कारणांमुळे नागरिकांची बँकेची कामे होत नाही.आष्टीतील ग्राहक आल्यापावली रिकाम्या हाताने परतलेचामोर्शी तालुक्यातील आष्टी हे मोठे व मध्यवर्ती गाव आहे. अनेकांचे बँक खाते येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. शुक्रवारी पैसे काढण्यासाठी बँकेत मोठी गर्दी झाली होती. मात्र बँकेची लिंक फेल असल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. पावसाळ्यात शेतकरी, विद्यार्थी, पगारदार वर्ग यांची बँकेत गर्दी होती. मात्र लिंक फेल राहत असल्याने आर्थिक व्यवहार होत नसल्याचा अनुभव अनेकवेळा नागरिकांना येतो. पैसे खर्च करून बसने आलेल्या वृध्द नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :bankबँक