शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

धानोरा व आष्टीतील बँक ग्राहकांना लिंकफेलचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा/आष्टी : ५ जुलै रोजी धानोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया व आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती ...

ठळक मुद्देदिवसभर केली प्रतीक्षा । ५० किमी अंतरावरून आलेल्या ग्राहकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा/आष्टी : ५ जुलै रोजी धानोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया व आष्टी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची लिंक फेल असल्याने ग्राहकांना बँकेत ताटकळत बसावे लागले.धानोरा येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव शाखा आहे. संपूर्ण तालुक्यातील नागरिक याच बँकेत येत असल्याने या बँकेत दिवसभर ग्राहकांची गर्दी राहते. शुक्रवारी सकाळपासूनच बँकेची लिंक फेल असल्याने कोणतेच व्यवहार दिवसभर झाले नाही. लिंक येईल व आर्थिक व्यवहार सुरू होतील, या अपेक्षेने ग्राहक दिवसभर थांबले. मात्र लिंक सुरू झाली नाही. आर्थिक व्यवहारही झाले नाही. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. काही नागरिक पीक कर्जाचे पैसे व इतर कामासाठी बँकेत आले होते. मात्र काम न झाल्याने आल्यापावली परत जावे लागले. एसबीआयचे एटीएम मागील तीन दिवसांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेतच जावे लागत आहे. बँकही काम करीत नसल्याने नागरिक निराश झाले. पेंढरी, कोटगूल, गोडलवाही, मुंगनेर, झाडापापडा या ग्रामीण भागातून अनेक नागरिक पैसे काढण्यासाठी आले होते. काही नागरिक केवायसी फार्म भरणे व इतर कामासाठी थांबले होते. ४० ते ५० किमी वरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.धानोरा तालुक्यात बँकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे ५० ते ६० किमी अंतरावरून नागरिकांना बँक व्यवहारांसाठी धानोरा येथे यावे लागते. विविध योजनांचे पैसे बँकेत जमा केले जातात. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना पैसे काढण्यासाठी धानोरा येथे आल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र लिंक फेल व इतर कारणांमुळे नागरिकांची बँकेची कामे होत नाही.आष्टीतील ग्राहक आल्यापावली रिकाम्या हाताने परतलेचामोर्शी तालुक्यातील आष्टी हे मोठे व मध्यवर्ती गाव आहे. अनेकांचे बँक खाते येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. शुक्रवारी पैसे काढण्यासाठी बँकेत मोठी गर्दी झाली होती. मात्र बँकेची लिंक फेल असल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. पावसाळ्यात शेतकरी, विद्यार्थी, पगारदार वर्ग यांची बँकेत गर्दी होती. मात्र लिंक फेल राहत असल्याने आर्थिक व्यवहार होत नसल्याचा अनुभव अनेकवेळा नागरिकांना येतो. पैसे खर्च करून बसने आलेल्या वृध्द नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :bankबँक