शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

विजेचा लपंडाव सुरू; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:34 IST

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अकरा वाजेनंतर लोकांना घराच्या बाहेर निघणे कठीण ...

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अकरा वाजेनंतर लोकांना घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे. तापमानात वाढ झाल्याने चटके बसायला सुरुवात झाल्याने दिवस - रात्र सतत पंखे सुरू आहेत. शहरातील बऱ्याचशा लोकांनी आपले कूलरही सुरू केले आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून आरमोरी शहरात विजेचा लपंडाव वाढल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहून अतिशय गंभीर आहे. एकदा वीज खंडित झाली तर दोन दोन तीन तीन तास विजेचा पत्ता नसतो. कधी कधी दिवसभर तर कधी रात्रभर गायब असते. अशा कठीण परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. वारंवार विजेच्या सततच्या ये-जा यामुळे लहान मुलांना मोठा फटका बसत आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने वीज वितरण कंपनीने आरमोरी शहर व ग्रामीण भागात सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.