शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वीज थकबाकीदारांची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:37 IST

दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत ....

ठळक मुद्दे११०० ग्राहकांची वीज कापली : सोमवारपासून महावितरणची जिल्हाभरात धडक मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास ११०० ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे महावितरण थकीत वसुलीवर अधिक भर देत आहे. वीज बिलाची रक्कम तत्काळ वसूल व्हावी, यासाठीच महावितरणने मागील पाच वर्षांपासून मासिक बिल पाठविणे सुरूवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दर महिन्याला जवळपास १८ ते १९ कोटी रूपयांची वीज खर्च होते. मात्र तेवढी मासिक वसुली येत नाही. विशेष करून शासकीय कार्यालयांची वसुली दोन ते तीन महिने येत नाही. परिणामी १०० टक्के वसुली होत नाही. कर्मचाºयांअभावी वीज जोडणी तोडण्यास विलंब होतो. परिणामी थकबाकी दोन ते तीन महिन्यांपर्यंत पोहोचते. आॅक्टोबर महिन्यापर्यंत गडचिरोली वीज विभागातील ३ हजार ४२७ ग्राहकांकडे २ कोटी १८ लाख ३३ हजार ६११ रूपयांची थकबाकी आहे. तर गडचिरोली विभागातील २ हजार ८६७ ग्राहकांकडे १ कोटी ५६ लाख ४६ हजार ९९६ रूपयांची थकबाकी आहे.थकीत वसुली व्हावी, त्याचबरोबर थकबाकीदार ग्राहकांना झटका देण्याच्या उद्देशाने गडचिरोली सर्कलचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे निर्देश ३० आॅक्टोबर रोजी दिले. अधीक्षक अभियंत्यांचे आदेश धडकताच महावितरणच्या जिल्हाभरातील अधिकारी, अभियंता व कर्मचाºयांनी धडक मोहीम सुरू केली असून दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास १ हजार १०० ग्राहकांचा वीज जोडणी तोडली आहे. सदर मोहीम नियिमित सुरू राहणार असल्याने थकबाकीदार ग्राहकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अनेकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे.

बिलावरची तारीख हीच अंतिम मुदतमहावितरणच्यावतीने विजेचे मासिक बिल पाठविले जाते. सदर बिल कोणत्याही परिस्थितीत बिलावर दिलेल्या तारखेच्यापूर्वी किंवा तारखेला भरणे आवश्यक आहे. अन्यथा सदर ग्राहकास वीज वितरण कंपनी थकबाकीदार माणून संबंधित ग्राहकाला १५ दिवसांच्या आत वीज बिल भरण्याबाबतचे नोटीस देते. त्यानंतरही संबंधित ग्राहकाने वीज बिल भरले नाही तर त्याचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. मात्र ग्राहकांच्या तुलनेत वीज कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने निश्चित कालावधीत वीज जोडणी कापणे शक्य होत नाही. परिणामी काही ग्राहकांकडे दोन ते तीन महिन्यांची थकबाकी राहूनही त्यांचा वीज पुरवठा सुरूच राहतो. त्यामुळे वीज बिल भरण्यासाठी वीज कंपनी एक ते दोन महिने मुदत देते. असा चुकीचा समज वीज ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. १५ दिवस वीज बिल थकीत राहिल्यास संबंधित ग्राहकाची वीज जोडणी कोणत्याही परिस्थिती तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांविरोधात वीज जोडणी खंडीत करण्याची धडक मोहीम ३० आॅक्टोबरपासून सुरू केली आहे. ही मोहीम थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी खंडीत होईपर्यंत कायम राहणार आहे. थकलेले वीज बिल कधीही भरावेच लागते. मात्र वीज जोडणी कापल्यास संबंधित ग्राहकाची समाजात बदनामी होते. त्याचबरोबर वीज बिल भरेपर्यंत अंधारात राहावे लागते. ही कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी नियमित वीज बिलाचा भरणा करावा.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली