शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

वीज थकबाकीदारांची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:37 IST

दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत ....

ठळक मुद्दे११०० ग्राहकांची वीज कापली : सोमवारपासून महावितरणची जिल्हाभरात धडक मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास ११०० ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे महावितरण थकीत वसुलीवर अधिक भर देत आहे. वीज बिलाची रक्कम तत्काळ वसूल व्हावी, यासाठीच महावितरणने मागील पाच वर्षांपासून मासिक बिल पाठविणे सुरूवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दर महिन्याला जवळपास १८ ते १९ कोटी रूपयांची वीज खर्च होते. मात्र तेवढी मासिक वसुली येत नाही. विशेष करून शासकीय कार्यालयांची वसुली दोन ते तीन महिने येत नाही. परिणामी १०० टक्के वसुली होत नाही. कर्मचाºयांअभावी वीज जोडणी तोडण्यास विलंब होतो. परिणामी थकबाकी दोन ते तीन महिन्यांपर्यंत पोहोचते. आॅक्टोबर महिन्यापर्यंत गडचिरोली वीज विभागातील ३ हजार ४२७ ग्राहकांकडे २ कोटी १८ लाख ३३ हजार ६११ रूपयांची थकबाकी आहे. तर गडचिरोली विभागातील २ हजार ८६७ ग्राहकांकडे १ कोटी ५६ लाख ४६ हजार ९९६ रूपयांची थकबाकी आहे.थकीत वसुली व्हावी, त्याचबरोबर थकबाकीदार ग्राहकांना झटका देण्याच्या उद्देशाने गडचिरोली सर्कलचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे निर्देश ३० आॅक्टोबर रोजी दिले. अधीक्षक अभियंत्यांचे आदेश धडकताच महावितरणच्या जिल्हाभरातील अधिकारी, अभियंता व कर्मचाºयांनी धडक मोहीम सुरू केली असून दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास १ हजार १०० ग्राहकांचा वीज जोडणी तोडली आहे. सदर मोहीम नियिमित सुरू राहणार असल्याने थकबाकीदार ग्राहकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अनेकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे.

बिलावरची तारीख हीच अंतिम मुदतमहावितरणच्यावतीने विजेचे मासिक बिल पाठविले जाते. सदर बिल कोणत्याही परिस्थितीत बिलावर दिलेल्या तारखेच्यापूर्वी किंवा तारखेला भरणे आवश्यक आहे. अन्यथा सदर ग्राहकास वीज वितरण कंपनी थकबाकीदार माणून संबंधित ग्राहकाला १५ दिवसांच्या आत वीज बिल भरण्याबाबतचे नोटीस देते. त्यानंतरही संबंधित ग्राहकाने वीज बिल भरले नाही तर त्याचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. मात्र ग्राहकांच्या तुलनेत वीज कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने निश्चित कालावधीत वीज जोडणी कापणे शक्य होत नाही. परिणामी काही ग्राहकांकडे दोन ते तीन महिन्यांची थकबाकी राहूनही त्यांचा वीज पुरवठा सुरूच राहतो. त्यामुळे वीज बिल भरण्यासाठी वीज कंपनी एक ते दोन महिने मुदत देते. असा चुकीचा समज वीज ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. १५ दिवस वीज बिल थकीत राहिल्यास संबंधित ग्राहकाची वीज जोडणी कोणत्याही परिस्थिती तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांविरोधात वीज जोडणी खंडीत करण्याची धडक मोहीम ३० आॅक्टोबरपासून सुरू केली आहे. ही मोहीम थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी खंडीत होईपर्यंत कायम राहणार आहे. थकलेले वीज बिल कधीही भरावेच लागते. मात्र वीज जोडणी कापल्यास संबंधित ग्राहकाची समाजात बदनामी होते. त्याचबरोबर वीज बिल भरेपर्यंत अंधारात राहावे लागते. ही कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी नियमित वीज बिलाचा भरणा करावा.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली