शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

वीज थकबाकीदारांची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:37 IST

दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत ....

ठळक मुद्दे११०० ग्राहकांची वीज कापली : सोमवारपासून महावितरणची जिल्हाभरात धडक मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास ११०० ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे महावितरण थकीत वसुलीवर अधिक भर देत आहे. वीज बिलाची रक्कम तत्काळ वसूल व्हावी, यासाठीच महावितरणने मागील पाच वर्षांपासून मासिक बिल पाठविणे सुरूवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दर महिन्याला जवळपास १८ ते १९ कोटी रूपयांची वीज खर्च होते. मात्र तेवढी मासिक वसुली येत नाही. विशेष करून शासकीय कार्यालयांची वसुली दोन ते तीन महिने येत नाही. परिणामी १०० टक्के वसुली होत नाही. कर्मचाºयांअभावी वीज जोडणी तोडण्यास विलंब होतो. परिणामी थकबाकी दोन ते तीन महिन्यांपर्यंत पोहोचते. आॅक्टोबर महिन्यापर्यंत गडचिरोली वीज विभागातील ३ हजार ४२७ ग्राहकांकडे २ कोटी १८ लाख ३३ हजार ६११ रूपयांची थकबाकी आहे. तर गडचिरोली विभागातील २ हजार ८६७ ग्राहकांकडे १ कोटी ५६ लाख ४६ हजार ९९६ रूपयांची थकबाकी आहे.थकीत वसुली व्हावी, त्याचबरोबर थकबाकीदार ग्राहकांना झटका देण्याच्या उद्देशाने गडचिरोली सर्कलचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे निर्देश ३० आॅक्टोबर रोजी दिले. अधीक्षक अभियंत्यांचे आदेश धडकताच महावितरणच्या जिल्हाभरातील अधिकारी, अभियंता व कर्मचाºयांनी धडक मोहीम सुरू केली असून दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास १ हजार १०० ग्राहकांचा वीज जोडणी तोडली आहे. सदर मोहीम नियिमित सुरू राहणार असल्याने थकबाकीदार ग्राहकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अनेकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे.

बिलावरची तारीख हीच अंतिम मुदतमहावितरणच्यावतीने विजेचे मासिक बिल पाठविले जाते. सदर बिल कोणत्याही परिस्थितीत बिलावर दिलेल्या तारखेच्यापूर्वी किंवा तारखेला भरणे आवश्यक आहे. अन्यथा सदर ग्राहकास वीज वितरण कंपनी थकबाकीदार माणून संबंधित ग्राहकाला १५ दिवसांच्या आत वीज बिल भरण्याबाबतचे नोटीस देते. त्यानंतरही संबंधित ग्राहकाने वीज बिल भरले नाही तर त्याचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. मात्र ग्राहकांच्या तुलनेत वीज कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने निश्चित कालावधीत वीज जोडणी कापणे शक्य होत नाही. परिणामी काही ग्राहकांकडे दोन ते तीन महिन्यांची थकबाकी राहूनही त्यांचा वीज पुरवठा सुरूच राहतो. त्यामुळे वीज बिल भरण्यासाठी वीज कंपनी एक ते दोन महिने मुदत देते. असा चुकीचा समज वीज ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. १५ दिवस वीज बिल थकीत राहिल्यास संबंधित ग्राहकाची वीज जोडणी कोणत्याही परिस्थिती तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांविरोधात वीज जोडणी खंडीत करण्याची धडक मोहीम ३० आॅक्टोबरपासून सुरू केली आहे. ही मोहीम थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी खंडीत होईपर्यंत कायम राहणार आहे. थकलेले वीज बिल कधीही भरावेच लागते. मात्र वीज जोडणी कापल्यास संबंधित ग्राहकाची समाजात बदनामी होते. त्याचबरोबर वीज बिल भरेपर्यंत अंधारात राहावे लागते. ही कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी नियमित वीज बिलाचा भरणा करावा.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली