शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

जीव महत्त्वाचाच, पण रोजगाराचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:14 IST

बुधवारच्या ट्रक-बस अपघातानंतर एटापल्लीत झालेल्या आंदोलनाने जिल्ह्याची राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हलली. या आंदोलनामुळेच मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या मदतीचा आकडा वाढला. आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री, खासदार, माजी राज्यमंत्री, माजी आमदारांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही एटापल्लीत जावे लागले.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबुधवारच्या ट्रक-बस अपघातानंतर एटापल्लीत झालेल्या आंदोलनाने जिल्ह्याची राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हलली. या आंदोलनामुळेच मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या मदतीचा आकडा वाढला. आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री, खासदार, माजी राज्यमंत्री, माजी आमदारांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही एटापल्लीत जावे लागले. हा एक प्रकारे आंदोलनकर्त्यांचा विजयच म्हणावा लागेल. पण कितीही आर्थिक मदत दिली तरी गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे जीवाची भरपाई पैशात तोलता येणार नाही. जी काही आर्थिक मदत मिळेल त्यातून कुटुंबियांना नक्कीच दिसाला मिळणार असला तरी ही मदत आयुष्याला पुरणार नाही. त्यांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करावा लागणार आहे. केवळ त्या मृत लोकांच्या परिवारातील सदस्यालाच नाही तर या परिसरात राहणाºया शेकडो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम कसे मिळेल याचा आंदोलनकर्त्यांनी शांत डोक्याने विचार करणे गरजेचे आहे.नक्षलवाद, विपरित भौगोलिक स्थिती, वन कायदा अशा एक ना अनेक अडचणींमुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिकांच्या वाट्याला आतापर्यंत खरा विकास आलाच नाही. लोहखनिजाची देण असतानाही विविध अडचणींचा विचार करून कोणत्याही कंपनीने या भागातील लोहखनिज काढण्याची किंवा लोहप्रकल्प उभारण्याची हिंमत केली नाही. लॉयड्स मेटल्स कंपनीने ही हिंमत दाखविल्याने या भागातील नागरिकांनी खरे तर त्यांच्या निर्णयाचे स्वागतच करायला पाहीजे होते. पण तसे झाले नाही. लोहखाणीचे काम सुरू झाल्यापासून अनेक स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळाले. कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या उभारणीनंतर त्या प्रकल्पात अनेकांना स्थायी रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यासाठी एटापल्ली तालुक्यातल्या बेरोजगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्या प्रकल्पात नोकरी देण्यास प्राधान्य देण्याची घोषणाही झाली आहे. असे असताना लोहखनिज काढणारे आपले शत्रू असल्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करणे कितपत योग्य आहे, याचा नागरिकांनी शांत डोक्याने विचार करण्याची वेळ आली आहे.अपघातानंतर गावकºयांनी संतापाच्या भरात लोहखनिज वाहतुकीसाठी जाणारे १५ ट्रक जाळले. यात संबंधित वाहतूकदाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे कायदा हाती घेऊन केलेली अशी हिंसक कृती निश्चितच समर्थनिय नाही. ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास दूर झालाच पाहीजे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने या मार्गाचे कंत्राटही दिले आहे. पण रस्त्याचे काम सुरू का झाले नाही, यासाठी आवाज उठवल्या गेला पाहीजे. कोनसरीच्या लोहप्रकल्पाचे काम सुरू का झाले नाही, यासाठी आवाज उठवला पाहीजे. पण अशा सकारात्मक गोष्टींसाठी आंदोलन न करता काम बंद पाडण्यासाठी जर प्रयत्न होत असेल तर हे आपल्याच पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. अशाने भविष्यात स्थानिक लोकांना रोजगार देणारा कोणताही उद्योग या भागात येण्यास तयार होणार नाही.इतक्या वर्षात या भागातील लोक ‘जैसे थे’ परिस्थितीत आहेत. ग्रामसभांना अधिकार मिळूनही त्यांच्या जीवनमानात फारसा बदल होऊन रोजगाराच्या संधी वाढलेल्या नाही. मग बेरोजगारांच्या आशा पल्लवित करणाºया कोणत्याही उद्योगधंद्यांना बंद पाडण्याचे कारस्थान रचले जात असेल तर गावकºयांनी त्यात वहावत जावे की नाही त्यांनी विचार करणे गरजेचे आहे.