शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

जीव महत्त्वाचाच, पण रोजगाराचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:14 IST

बुधवारच्या ट्रक-बस अपघातानंतर एटापल्लीत झालेल्या आंदोलनाने जिल्ह्याची राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हलली. या आंदोलनामुळेच मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या मदतीचा आकडा वाढला. आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री, खासदार, माजी राज्यमंत्री, माजी आमदारांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही एटापल्लीत जावे लागले.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबुधवारच्या ट्रक-बस अपघातानंतर एटापल्लीत झालेल्या आंदोलनाने जिल्ह्याची राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा हलली. या आंदोलनामुळेच मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या मदतीचा आकडा वाढला. आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे पालकमंत्री, खासदार, माजी राज्यमंत्री, माजी आमदारांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही एटापल्लीत जावे लागले. हा एक प्रकारे आंदोलनकर्त्यांचा विजयच म्हणावा लागेल. पण कितीही आर्थिक मदत दिली तरी गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे जीवाची भरपाई पैशात तोलता येणार नाही. जी काही आर्थिक मदत मिळेल त्यातून कुटुंबियांना नक्कीच दिसाला मिळणार असला तरी ही मदत आयुष्याला पुरणार नाही. त्यांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करावा लागणार आहे. केवळ त्या मृत लोकांच्या परिवारातील सदस्यालाच नाही तर या परिसरात राहणाºया शेकडो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम कसे मिळेल याचा आंदोलनकर्त्यांनी शांत डोक्याने विचार करणे गरजेचे आहे.नक्षलवाद, विपरित भौगोलिक स्थिती, वन कायदा अशा एक ना अनेक अडचणींमुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिकांच्या वाट्याला आतापर्यंत खरा विकास आलाच नाही. लोहखनिजाची देण असतानाही विविध अडचणींचा विचार करून कोणत्याही कंपनीने या भागातील लोहखनिज काढण्याची किंवा लोहप्रकल्प उभारण्याची हिंमत केली नाही. लॉयड्स मेटल्स कंपनीने ही हिंमत दाखविल्याने या भागातील नागरिकांनी खरे तर त्यांच्या निर्णयाचे स्वागतच करायला पाहीजे होते. पण तसे झाले नाही. लोहखाणीचे काम सुरू झाल्यापासून अनेक स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळाले. कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या उभारणीनंतर त्या प्रकल्पात अनेकांना स्थायी रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यासाठी एटापल्ली तालुक्यातल्या बेरोजगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्या प्रकल्पात नोकरी देण्यास प्राधान्य देण्याची घोषणाही झाली आहे. असे असताना लोहखनिज काढणारे आपले शत्रू असल्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करणे कितपत योग्य आहे, याचा नागरिकांनी शांत डोक्याने विचार करण्याची वेळ आली आहे.अपघातानंतर गावकºयांनी संतापाच्या भरात लोहखनिज वाहतुकीसाठी जाणारे १५ ट्रक जाळले. यात संबंधित वाहतूकदाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे कायदा हाती घेऊन केलेली अशी हिंसक कृती निश्चितच समर्थनिय नाही. ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास दूर झालाच पाहीजे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने या मार्गाचे कंत्राटही दिले आहे. पण रस्त्याचे काम सुरू का झाले नाही, यासाठी आवाज उठवल्या गेला पाहीजे. कोनसरीच्या लोहप्रकल्पाचे काम सुरू का झाले नाही, यासाठी आवाज उठवला पाहीजे. पण अशा सकारात्मक गोष्टींसाठी आंदोलन न करता काम बंद पाडण्यासाठी जर प्रयत्न होत असेल तर हे आपल्याच पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. अशाने भविष्यात स्थानिक लोकांना रोजगार देणारा कोणताही उद्योग या भागात येण्यास तयार होणार नाही.इतक्या वर्षात या भागातील लोक ‘जैसे थे’ परिस्थितीत आहेत. ग्रामसभांना अधिकार मिळूनही त्यांच्या जीवनमानात फारसा बदल होऊन रोजगाराच्या संधी वाढलेल्या नाही. मग बेरोजगारांच्या आशा पल्लवित करणाºया कोणत्याही उद्योगधंद्यांना बंद पाडण्याचे कारस्थान रचले जात असेल तर गावकºयांनी त्यात वहावत जावे की नाही त्यांनी विचार करणे गरजेचे आहे.