शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

झिमेलावासीयांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:33 IST

अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.

ठळक मुद्देपावसाने रपटा वाहून गेला : प्रशासनासह लोकप्रतिनिधींची उदासीनता चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून उत्तरेकडे चार किमी अंतरावर असलेल्या झिमेला गावाला जाणाऱ्या मार्गावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. अत्यंत आवश्यकता असताना प्रशासनाने या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण केला नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात झिमेला गावातील नागरिकांसमोर आवागमनाची मोठी समस्या निर्माण होते.अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.झिमेला गावाला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र नाल्यावर पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण करण्यात न आल्याने दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होते. औषधोपचारासाठी तालुकास्ळी अहेरीला जाण्यासाठी पुलाअभावी मोठी अडचण निर्माण होते. याच मार्गाने कर्मचारी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस व पुलाच्या अभावामुळे या भागातील दळणवळण व्यवस विस्कळीत झाली आहे. सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने झिमेला गावाकडे जाणारा रस्ता व पुलाचे काम केले नाही.पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी रस्ते व पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महामंत्री संतोष गणपूरवार, जयसेवा समितीचे सल्लागार मोनिष पेंदाम, झिमेला येीेल धर्मराव पोरतेट, भगवान सिडाम, विनोद तोरेम, सुरेश पोरतेट, तिरूपती सडमेक यांच्यासह इतर गावकऱ्यांनी केली आहे.डांबरीकरणाचा पत्ता नाहीतीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झिमेला गावाकडे जाणाऱ्या व मुख्य मार्गाला जोडणाºया रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र डांबरीकरणाचे काम झाले नाही. या मार्गावर एकूण तीन ठिकाणी रपट्याचे काम करणे आवश्यक आहे. मात्र सर्वात मोठा रपटा झिमेला गावाजवळच्या नाल्यावर आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या रपट्यावर पाणी चढत असते. यावर्षीच्या पावसाने सदर रपटा पूर्णत: वाहून गेला. या ठिकाणी मजबूत स्वरूपाचे पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.