शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

झिमेलावासीयांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:33 IST

अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.

ठळक मुद्देपावसाने रपटा वाहून गेला : प्रशासनासह लोकप्रतिनिधींची उदासीनता चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून उत्तरेकडे चार किमी अंतरावर असलेल्या झिमेला गावाला जाणाऱ्या मार्गावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. अत्यंत आवश्यकता असताना प्रशासनाने या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण केला नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात झिमेला गावातील नागरिकांसमोर आवागमनाची मोठी समस्या निर्माण होते.अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.झिमेला गावाला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र नाल्यावर पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण करण्यात न आल्याने दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होते. औषधोपचारासाठी तालुकास्ळी अहेरीला जाण्यासाठी पुलाअभावी मोठी अडचण निर्माण होते. याच मार्गाने कर्मचारी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस व पुलाच्या अभावामुळे या भागातील दळणवळण व्यवस विस्कळीत झाली आहे. सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने झिमेला गावाकडे जाणारा रस्ता व पुलाचे काम केले नाही.पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी रस्ते व पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महामंत्री संतोष गणपूरवार, जयसेवा समितीचे सल्लागार मोनिष पेंदाम, झिमेला येीेल धर्मराव पोरतेट, भगवान सिडाम, विनोद तोरेम, सुरेश पोरतेट, तिरूपती सडमेक यांच्यासह इतर गावकऱ्यांनी केली आहे.डांबरीकरणाचा पत्ता नाहीतीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झिमेला गावाकडे जाणाऱ्या व मुख्य मार्गाला जोडणाºया रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र डांबरीकरणाचे काम झाले नाही. या मार्गावर एकूण तीन ठिकाणी रपट्याचे काम करणे आवश्यक आहे. मात्र सर्वात मोठा रपटा झिमेला गावाजवळच्या नाल्यावर आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या रपट्यावर पाणी चढत असते. यावर्षीच्या पावसाने सदर रपटा पूर्णत: वाहून गेला. या ठिकाणी मजबूत स्वरूपाचे पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.