शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

झिमेलावासीयांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:33 IST

अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.

ठळक मुद्देपावसाने रपटा वाहून गेला : प्रशासनासह लोकप्रतिनिधींची उदासीनता चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून उत्तरेकडे चार किमी अंतरावर असलेल्या झिमेला गावाला जाणाऱ्या मार्गावरील रपटा पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. अत्यंत आवश्यकता असताना प्रशासनाने या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण केला नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात झिमेला गावातील नागरिकांसमोर आवागमनाची मोठी समस्या निर्माण होते.अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी समस्या कायम आहेत.झिमेला गावाला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र नाल्यावर पक्क्या स्वरूपाचा पूल निर्माण करण्यात न आल्याने दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होते. औषधोपचारासाठी तालुकास्ळी अहेरीला जाण्यासाठी पुलाअभावी मोठी अडचण निर्माण होते. याच मार्गाने कर्मचारी ये-जा करतात. मात्र रस्त्याची दुरवस व पुलाच्या अभावामुळे या भागातील दळणवळण व्यवस विस्कळीत झाली आहे. सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने झिमेला गावाकडे जाणारा रस्ता व पुलाचे काम केले नाही.पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी रस्ते व पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महामंत्री संतोष गणपूरवार, जयसेवा समितीचे सल्लागार मोनिष पेंदाम, झिमेला येीेल धर्मराव पोरतेट, भगवान सिडाम, विनोद तोरेम, सुरेश पोरतेट, तिरूपती सडमेक यांच्यासह इतर गावकऱ्यांनी केली आहे.डांबरीकरणाचा पत्ता नाहीतीन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झिमेला गावाकडे जाणाऱ्या व मुख्य मार्गाला जोडणाºया रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र डांबरीकरणाचे काम झाले नाही. या मार्गावर एकूण तीन ठिकाणी रपट्याचे काम करणे आवश्यक आहे. मात्र सर्वात मोठा रपटा झिमेला गावाजवळच्या नाल्यावर आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या रपट्यावर पाणी चढत असते. यावर्षीच्या पावसाने सदर रपटा पूर्णत: वाहून गेला. या ठिकाणी मजबूत स्वरूपाचे पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.