शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

जीवन सुंदर आहे, हसत-हसत जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:20 IST

जीवन हे मानवाला प्राप्त झालेले जीवन हे अतिशय सुंदर आहे. स्वत:वर विश्वास ठेवून जीवन जगल्यास आत्मसंतुष्टीचा मार्ग सापडतो. आज निर्माण झालेल्या अडचणी प्रयत्नांनी कायमच्या नष्ट होतात. त्यामुळे अडचणींमुळे दुखी होऊ नका. त्या सोडविण्याचा प्रयत्न करा.

ठळक मुद्देगणेश शिंदे यांचे गडचिरोली येथे व्याख्यान : पोलीस अधिकारी, कर्मचारी कुटुंबीयांसाठी तणावमुक्त शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जीवन हे मानवाला प्राप्त झालेले जीवन हे अतिशय सुंदर आहे. स्वत:वर विश्वास ठेवून जीवन जगल्यास आत्मसंतुष्टीचा मार्ग सापडतो. आज निर्माण झालेल्या अडचणी प्रयत्नांनी कायमच्या नष्ट होतात. त्यामुळे अडचणींमुळे दुखी होऊ नका. त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. तेव्हा जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडेल, असे प्रतिपादन पुणे येथील व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले.रेझींग डे निमित्त पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून पोलिसांसाठी ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर तणावमुक्त व्याख्यानाचे आयोजन बुधवारी गडचिरोली येथे करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्रभारी पोलीस अधीक्षक प्रदीप चौगावकर, आदर्श मित्र मंडळ पुणेचे संस्थापक उदय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ३६ पोलिसांचे कुटुंबिय व ७५ पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.प्रा.गणेश शिंदे यांनी सांगितले की, आपल्याला ईश्वराने मानवी जीवन दिले आहे. आपले हे जीवन स्वच्छ व सुंदर आहे. ते आपण तणाव विरहीत हसत-हसत जगावे. देश रक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने जवानांवर आहे. आपण एका हातात शास्त्र व एका हातात शस्त्र घेऊन दिवसरात्र पहारा देत आहात म्हणून या देशातील सर्व नागरिक सुखाने व निवांत झोपत आहेत. उन, वारा, पाऊस व थंडीत विविध संकटावर मात करीत आपण देश रक्षणाचे काम करीत आहात. घनदाट जंगलात आपण वाट काढीत नक्षल्यांशी लढत आहात. म्हणून आपल्या कार्याला सर्व जनता सलाम करते. घरापासून व कुटूंबापासून लांब अंतरावर राहून देश सेवेचे व्रत हाती घेतले आहे. म्हणून आपण तनावरहीत जीवन हसत-हसत जगावे. एका पेक्षा अनेकांनी हसत राहील्यास तणाव नक्कीच कमी होतो. म्हणून तुम्ही हसा व दुसºयाला हसवा, असे शेवटी आपल्या व्याख्यानातून प्रा.गणेश शिंदे यांनी सांगितले. संचालन पोलीस उपनिरीक्षक यशवंत नलावडे यांनी केले.