शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

शैक्षणिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करू- कल्याणकर

By admin | Updated: September 8, 2015 03:46 IST

गडचिरोली, चंद्रपूरची उर्वरित महाराष्ट्राशी असलेली शैक्षणिक विषमता कमी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या

गडचिरोली : गडचिरोली, चंद्रपूरची उर्वरित महाराष्ट्राशी असलेली शैक्षणिक विषमता कमी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कल्याणावर भर देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे नव नियुक्त कुलगुरू डॉ. नामदेव व्यंकटराव कल्याणकर यांनी सोमवारी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात सायंकाळी त्यांचा पदग्रहण व मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा निरोप सोहळा पार पडला. यावेळी डॉ. कल्याणकर बोलत होते. यावेळी मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर, विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य समीर केने व विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विवेक जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी कुलगुरूंच्या कक्षात मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांना कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविला. त्यानंतर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांचे मावळते कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी डॉ. चांदेकर यांचाही डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना मावळते कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले, विद्यापीठे हे केवळ विद्यार्थ्यांना पदवी देण्यापूर्ती मर्यादित राहू नये. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या संस्कृतीवर केंद्र निर्माण होणे गरजेचे आहे. याशिवाय जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या वन व नैसर्गिक साधनसंपदेवर कौशल्य अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नवनियुक्त कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी कोणत्याही संस्था या माणूस व पदांपेक्षा मोठ्या असतात. याची जाण ठेवून गोंडवाना विद्यापीठाचा लौकीक महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी आपण जोरकस प्रयत्न करू, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विनायक इरपाते तर संचालन डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)असे आहेत नवे कुलगुरू४डॉ. नामदेव कल्याणकर यांची शिक्षण क्षेत्रात ३४ वर्षांची सेवा झाली असून व्यवस्थापनाचा त्यांना १९ वर्षांचा अनुभव आहे. भौतिक व संगणकशास्त्रात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. विज्ञान शाखेतील पद्व्युत्तर, पदवीसह डीएचई व आचार्य पदवी त्यांनी मिळविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात नऊ विद्यार्थ्यांनी आचार्य व १८ विद्यार्थ्यांनी एमफील पदवी घेतली आहे. ७५ रिसर्च पेपर आणि दोन पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहे. सायबर क्राईम या विषयावर त्यांनी बहुमोल असे संशोधनाचे कामही केलेले आहे.