शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

शैक्षणिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करू- कल्याणकर

By admin | Updated: September 8, 2015 03:46 IST

गडचिरोली, चंद्रपूरची उर्वरित महाराष्ट्राशी असलेली शैक्षणिक विषमता कमी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या

गडचिरोली : गडचिरोली, चंद्रपूरची उर्वरित महाराष्ट्राशी असलेली शैक्षणिक विषमता कमी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कल्याणावर भर देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे नव नियुक्त कुलगुरू डॉ. नामदेव व्यंकटराव कल्याणकर यांनी सोमवारी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात सायंकाळी त्यांचा पदग्रहण व मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा निरोप सोहळा पार पडला. यावेळी डॉ. कल्याणकर बोलत होते. यावेळी मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर, विद्यापीठाच्या विद्वत्त परिषदेचे सदस्य समीर केने व विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विवेक जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी कुलगुरूंच्या कक्षात मावळते कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांना कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविला. त्यानंतर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांचे मावळते कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी डॉ. चांदेकर यांचाही डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना मावळते कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले, विद्यापीठे हे केवळ विद्यार्थ्यांना पदवी देण्यापूर्ती मर्यादित राहू नये. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या संस्कृतीवर केंद्र निर्माण होणे गरजेचे आहे. याशिवाय जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या वन व नैसर्गिक साधनसंपदेवर कौशल्य अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नवनियुक्त कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी कोणत्याही संस्था या माणूस व पदांपेक्षा मोठ्या असतात. याची जाण ठेवून गोंडवाना विद्यापीठाचा लौकीक महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी आपण जोरकस प्रयत्न करू, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विनायक इरपाते तर संचालन डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)असे आहेत नवे कुलगुरू४डॉ. नामदेव कल्याणकर यांची शिक्षण क्षेत्रात ३४ वर्षांची सेवा झाली असून व्यवस्थापनाचा त्यांना १९ वर्षांचा अनुभव आहे. भौतिक व संगणकशास्त्रात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. विज्ञान शाखेतील पद्व्युत्तर, पदवीसह डीएचई व आचार्य पदवी त्यांनी मिळविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात नऊ विद्यार्थ्यांनी आचार्य व १८ विद्यार्थ्यांनी एमफील पदवी घेतली आहे. ७५ रिसर्च पेपर आणि दोन पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहे. सायबर क्राईम या विषयावर त्यांनी बहुमोल असे संशोधनाचे कामही केलेले आहे.