शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुंजणे जळालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार

By admin | Updated: February 8, 2015 23:47 IST

जिल्ह्यात दरवर्षी धानाचे पुंजने जळून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिसळते.

चामोर्शी : जिल्ह्यात दरवर्षी धानाचे पुंजने जळून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिसळते. पुंजने जळालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी गौरीपूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. वर्षभर शेतात राबून शेतकरी धानाची लागवड करतो. यासाठी अनेकांना बँक व बचत गटांकडून कर्ज काढावे लागते. मात्र धान पिकाची कामणी झाल्यानंतर काही असामाजिक तत्त्वांकडून पुंजन्याला आग लावली जाते. अशा अनेक घटना यंदाच्या खरीप हंगामात घडल्या आहेत. गौरीपूर येथील शेतकरी हरीदास मनमोहन हवालदार यांच्या पुंजन्याला अज्ञात इसमांनी आग लावून जाळले. त्यांना व इतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून गौरीपूर भाजप शाखेचे प्रमुख अशीम मुखर्जी यांनी भाजप बंगाली आघाडीच्या शिष्ट मंडळाच्या वतीने होळी यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी होळी यांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हाधिकारी यांच्याकडे विशेष निधीतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करू असे आश्वासन दिले. यावेळी महानंद मंडल, हरीदास मंडल, रमेश अधिकारी, शक्ती मंडल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)