शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

सुविधांअभावी कोठी आश्रमशाळेकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: August 14, 2015 01:47 IST

नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापलेल्या भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, ....

गडचिरोली : नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापलेल्या भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने तालुक्यातील कोठी येथे आश्रमशाळेची प्रशस्त इमारत बांधली. मात्र या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. त्याचबरोबर शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी परिसरातील विद्यार्थ्यांनी या आश्रमशाळेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दिवसंदिवस कमी होत आहे. कोठी हे गाव भामरागड मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर आहे. कोठी परिसरातील गावे आदिवासीबहुल असून रस्त्यांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने कोठी येथे आश्रमशाळा उघडण्यास मान्यता दिली. काही वर्षांपूर्वी कोठी येथे कोट्यवधी रूपये खर्चुन आश्रमशाळेची प्रशस्त इमारत बांधण्यात आली. मात्र या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. शाळेच्या परिसरात तीन हातपंप खोदण्यात आले आहेत. पाण्यासाठी पाण्याची टाकी बनविण्यात आली आहे. परंतु तिचा अजूनपर्यंत वापर सुरू झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हातपंपाचेच पाणी आणावे लागते. शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम मागील चार वर्षांपासून अर्धवट सोडण्यात आले आहे. संरक्षण भिंतीअभावी आश्रमशाळा परिसरात मोकाट जनावरे व डुकरांचा रात्रंदिवस वावर राहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी संसर्गजन्य रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.मागील वर्षी याच शाळेतील दोन मुलांचा आजाराने मृत्यू झाला होता. याविरोधात पालकांनी आंदोलन उभारले होते. त्यावेळी मुख्याध्यापक व अधीक्षकांवर निलंबित होण्याची पाळी आली होती. मुलींकरिता १० शौचालये असली तरी त्यातील दोनच शौचालये सुरू आहेत. बाकी संपूर्ण शौचालय चोकअप झाली आहेत. त्यामुळे मुलींची मोठी गैरसोय होत असून शौचासाठी बाहेर जावे लागते. एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेच्या परिसरात सोलर वॉटर हिटर भंगारामध्ये जमा झाले आहे. या सर्व असुविधांमुळे कोठी परिसरातील विद्यार्थी या आश्रमशाळेकडे पाठ फिरवित चालले आहेत. पालकवर्ग आपल्या पाल्यांना कन्हाळगाव व इतर आश्रमशाळांमध्ये पाठवित आहेत. परिणामी या आश्रमशाळेत सध्य:स्थितीत केवळ ३५० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचेही भविष्य अंधकारमय झाले आहे. आश्रमशाळेच्या परिस्थितीबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी १३ आॅगस्ट प्रस्तूत प्रतिनिधीने कार्यालयाला भेट दिली असता, प्रकल्प अधिकारी उपस्थित नव्हते. दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.