शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

अधिकृत वीज जोडणीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:26 IST

जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते.

ठळक मुद्देपावसामुळे वीजेच्या अपघाताची शक्यता : केवळ १४ गणेश मंडळांनी केले महावितरणकडे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ढोलताशांच्या गजरात यावर्षीही सार्वजनिक मंडळे व खासगीरित्या अनेकांनी गणरायाची १० दिवसांसाठी प्रतिष्ठापणा केली. मात्र सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्हाभरात सुमारे ७५० सार्वजनिक मंडळांतर्फे गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली, मात्र महावितरण कंपनीकडे अधिकृत वीज पुरवठ्यासाठी जिल्हाभरातून केवळ १४ अर्ज प्राप्त झाले आहेत. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने यावर्षीही रोषणासाठी अनधिकृत वीज पुरवठा घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सवलत सुध्दा दिली जाते. तरीही बहुतांश गणेश मंडळे जवळपासच्या एखाद्या वीज तारेवर हुक लटकवून वीज पुरवठा घेत असल्याचे दिसून येते.वीज जोडणीसाठी गडचिरोली विभागांतर्गत २ सप्टेंबरपर्यंत १२ गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी चार मंडळांनी पैसे भरल्याने त्यांना अधिकृत वीज पुरवठा देण्यात आला आहे. एका मंडळाने पैसे भरले नाही. १२ अर्जांपैकी सात अर्ज २ सप्टेंबर रोजी उपलब्ध झाले. त्यांना वीज पुरवठा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आलापल्ली विभागांतर्गत केवळ दोन मंडळांनी अर्ज केले होते. या दोन्ही मंडळांना वीज पुरवठा दिला आहे.गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सूट दिली जाते. अधिकृत वीज पुरवठा घेतल्यास विद्युत संचाची जोडणी योग्य आहे किंवा नाही, याची शहनिशा महावितरणचे अधिकारी करतात. सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेतली जाते. यावर्षी पाऊस येत आहे. त्यामुळे वीज तारांवर हुक लटकवून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या मंडळांनी अजुनही वीज पुरवठ्यासाठी अर्ज केला नाही, त्यांनी अर्ज करावा व अधिकृत वीज पुरवठा घ्यावा. अनधिकृत वीज पुरवठा असलेल्यांवर यावर्षी नक्कीच कारवाई केली जाईल.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता,महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीज