शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अधिकृत वीज जोडणीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:26 IST

जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते.

ठळक मुद्देपावसामुळे वीजेच्या अपघाताची शक्यता : केवळ १४ गणेश मंडळांनी केले महावितरणकडे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ढोलताशांच्या गजरात यावर्षीही सार्वजनिक मंडळे व खासगीरित्या अनेकांनी गणरायाची १० दिवसांसाठी प्रतिष्ठापणा केली. मात्र सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्हाभरात सुमारे ७५० सार्वजनिक मंडळांतर्फे गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली, मात्र महावितरण कंपनीकडे अधिकृत वीज पुरवठ्यासाठी जिल्हाभरातून केवळ १४ अर्ज प्राप्त झाले आहेत. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने यावर्षीही रोषणासाठी अनधिकृत वीज पुरवठा घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. तसेच हजारो बल्बसाठी अधिक व्होल्टेजची आवश्यकता भासते. विद्युत जोडणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते. गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सवलत सुध्दा दिली जाते. तरीही बहुतांश गणेश मंडळे जवळपासच्या एखाद्या वीज तारेवर हुक लटकवून वीज पुरवठा घेत असल्याचे दिसून येते.वीज जोडणीसाठी गडचिरोली विभागांतर्गत २ सप्टेंबरपर्यंत १२ गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी चार मंडळांनी पैसे भरल्याने त्यांना अधिकृत वीज पुरवठा देण्यात आला आहे. एका मंडळाने पैसे भरले नाही. १२ अर्जांपैकी सात अर्ज २ सप्टेंबर रोजी उपलब्ध झाले. त्यांना वीज पुरवठा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आलापल्ली विभागांतर्गत केवळ दोन मंडळांनी अर्ज केले होते. या दोन्ही मंडळांना वीज पुरवठा दिला आहे.गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, यासाठी महावितरणतर्फे वीज बिलात सूट दिली जाते. अधिकृत वीज पुरवठा घेतल्यास विद्युत संचाची जोडणी योग्य आहे किंवा नाही, याची शहनिशा महावितरणचे अधिकारी करतात. सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेतली जाते. यावर्षी पाऊस येत आहे. त्यामुळे वीज तारांवर हुक लटकवून अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या मंडळांनी अजुनही वीज पुरवठ्यासाठी अर्ज केला नाही, त्यांनी अर्ज करावा व अधिकृत वीज पुरवठा घ्यावा. अनधिकृत वीज पुरवठा असलेल्यांवर यावर्षी नक्कीच कारवाई केली जाईल.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता,महावितरण गडचिरोली

टॅग्स :electricityवीज