शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्यापेक्षा कमी वृक्ष जिवंत

By admin | Updated: September 10, 2014 23:39 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात सन २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची विशेष तपासणी हरित सेनेच्या शिक्षक

तपासणीत झाले उघड : वृक्ष संगोपनात ग्रामपंचायती फेलदिलीप दहेलकर - गडचिरोलीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात सन २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची विशेष तपासणी हरित सेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेले निम्म्यापेक्षाही कमी वृक्ष जीवंत असल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी तपासणीच्या प्राथमिक अहवालावरून लागवड केलेल्या वृक्षाचे योग्य संगोपन करण्यात साऱ्याच ग्रामपंचायती अपयशी ठरल्या असल्याचे दिसून येते.राज्यशासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत गावपरिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड करण्यात येते. सदर वृक्षलागवडीचा कार्यक्रम दरवर्षी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबविला जातो. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची तपासणी यंत्रणेमार्फत करण्यात आली होती. मात्र यंत्रणेने तयार केलेल्या तपासणी अहवालात पूर्णत: तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे शासनाने निरपेक्ष विशेष वृक्षलागवड तपासणीची मोहीम हाती घेतली. या संदर्भात शासन निर्णय काढून हरित संरक्षक गटांमार्फत ग्रा. पं. च्या वृक्षलागवडीच्या तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या तपासणीकरिता हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. याबाबत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी एक विशेष बैठक बोलावून वृक्षलागवड तपासणीच्या कार्यक्रमाचे नियोजन निश्चित करण्यात आले होते. या कार्यक्रमानुसार २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत शाळातील हरित सेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत विशेष तपासणी करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुटीच्या दिवशी वृक्षलागवड कार्यक्रमाची तपासणी करून अहवाल जि. प. प्रशासनाकडे सादर केला आहे. तपासणीअंती प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालावरून सन २०१२-१३ या वर्षातील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातील जीवंत रोपट्याची टक्केवारी ३२.६५ आहे. तर सन २०१३-१४ या वर्षात लागवड करण्यात आलेल्या जीवंत रोपट्याची टक्केवारी ४३.५७ आहे. '