शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार शेतकºयांची पीक विम्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:30 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ६ हजार ६९ शेतकºयांनी विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देकर्जदारांना सक्ती : १७ हजार ७१७ शेतकरी योजनेत सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ६ हजार ६९ शेतकºयांनी विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे. मागील वर्षी २३ हजार ७८६ शेतकºयांनी विमा काढला होता. तर यावर्षी केवळ १७ हजार ७१७ शेतकºयांनी विमा काढला आहे.अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ यासह मानव व निसर्ग निर्मित आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. या नुकसानीमुळे शेतकºयाचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यावेळी सदर शेतकºयावर फार मोठे आर्थिक संकट कोसळते. अशा परिस्थितीत संबंधित शेतकºयाला थोडीफार आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकºयांनी विमा काढावा, यासाठी कृषी विभागातील अधिकाºयांनी जनजागृती केली. मात्र याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पीक विमाधारक शेतकºयांची संख्या ६ हजार ६४ ने घटली आहे. चालू वर्षी १७ हजार ७१७ शेतकºयांनी २२ हजार ४५६ हेक्टरचा विमा काढला आहे. १ कोटी ६१ लाख ८२ हजार ६८८ रूपयांचा विमा प्रिमीयम सादर केला आहे.शेतीचे नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळत नाही. हा दरवर्षीचा शेतकºयांचा अनुभव असल्याने बहुतांश शेतकरी पीक विम्याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कर्ज घेणाºया शेतकºयांना विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जे शेतकरी कर्ज काढतात, त्यांच्या कर्जाच्या रक्कमेतूनच विम्याची रक्कम कपात केली जाते. ते शेतकरी विमाधारक बनतात. मात्र स्वत:हून शेतकरी पीक विमा काढण्यास तयार होत नाही. परिणामी प्रशासनाच्या जनजागृतीनंतरही पीक विमा काढण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. धानाव्यतिरिक्त कापूस, सोयाबिन यासारख्या पिकांचा विमा काढण्याचे प्रमाण धानाच्या तुलनेत कमी आहे.जिल्हा बँकेकडे शेतकºयांचा ओढाचालू खरीप हंगामासाठी विमा काढलेल्या एकूण १७ हजार ७१७ शेतकºयांपैकी १२ हजार ३८९ शेतकºयांनी जिल्हा सहकारी बँकेतून विमा काढला आहे. आयसीआयसीआय बँक व एक्सीस बँकेतून एकाही शेतकºयाने विमा काढला नाही. विजया बँकेची केवळ दोन शेतकºयांनी विमा काढला असल्याचे दिसून येत आहे.कर्जमाफीचा कर्ज भरण्यासह विमा काढण्यावर परिणामकर्जमाफीचे वारे जवळपास एप्रिलपासूनच वाहण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी चालू कर्ज व मागचेही कर्ज भरले नाही. परिणामी या शेतकºयांना नवीन कर्ज मिळाले नाही. कर्ज घेणाºया शेतकºयांना विमा सक्तीचा आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांची संख्या घटल्याने विमाधारकांचीही संख्या घटली आहे. मागील वर्षी २२ हजार ९६७ कर्जधारकांनी विमा काढला होता. तर यावर्षी केवळ १६ हजार ९०३ कर्जधारकांनी विमा काढला आहे. मागील वर्षी कर्ज न घेणाºया ८१९ शेतकºयांनी विमा काढला होता. तर यावर्षी ८१५ शेतकºयांनी विमा काढला आहे. एकंदरीतच कर्ज न घेता विमा काढणाºया शेतकºयांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येते.