शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सहा हजार शेतकºयांची पीक विम्याकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:30 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ६ हजार ६९ शेतकºयांनी विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देकर्जदारांना सक्ती : १७ हजार ७१७ शेतकरी योजनेत सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ६ हजार ६९ शेतकºयांनी विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे. मागील वर्षी २३ हजार ७८६ शेतकºयांनी विमा काढला होता. तर यावर्षी केवळ १७ हजार ७१७ शेतकºयांनी विमा काढला आहे.अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ यासह मानव व निसर्ग निर्मित आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. या नुकसानीमुळे शेतकºयाचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यावेळी सदर शेतकºयावर फार मोठे आर्थिक संकट कोसळते. अशा परिस्थितीत संबंधित शेतकºयाला थोडीफार आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकºयांनी विमा काढावा, यासाठी कृषी विभागातील अधिकाºयांनी जनजागृती केली. मात्र याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पीक विमाधारक शेतकºयांची संख्या ६ हजार ६४ ने घटली आहे. चालू वर्षी १७ हजार ७१७ शेतकºयांनी २२ हजार ४५६ हेक्टरचा विमा काढला आहे. १ कोटी ६१ लाख ८२ हजार ६८८ रूपयांचा विमा प्रिमीयम सादर केला आहे.शेतीचे नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळत नाही. हा दरवर्षीचा शेतकºयांचा अनुभव असल्याने बहुतांश शेतकरी पीक विम्याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कर्ज घेणाºया शेतकºयांना विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जे शेतकरी कर्ज काढतात, त्यांच्या कर्जाच्या रक्कमेतूनच विम्याची रक्कम कपात केली जाते. ते शेतकरी विमाधारक बनतात. मात्र स्वत:हून शेतकरी पीक विमा काढण्यास तयार होत नाही. परिणामी प्रशासनाच्या जनजागृतीनंतरही पीक विमा काढण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. धानाव्यतिरिक्त कापूस, सोयाबिन यासारख्या पिकांचा विमा काढण्याचे प्रमाण धानाच्या तुलनेत कमी आहे.जिल्हा बँकेकडे शेतकºयांचा ओढाचालू खरीप हंगामासाठी विमा काढलेल्या एकूण १७ हजार ७१७ शेतकºयांपैकी १२ हजार ३८९ शेतकºयांनी जिल्हा सहकारी बँकेतून विमा काढला आहे. आयसीआयसीआय बँक व एक्सीस बँकेतून एकाही शेतकºयाने विमा काढला नाही. विजया बँकेची केवळ दोन शेतकºयांनी विमा काढला असल्याचे दिसून येत आहे.कर्जमाफीचा कर्ज भरण्यासह विमा काढण्यावर परिणामकर्जमाफीचे वारे जवळपास एप्रिलपासूनच वाहण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी चालू कर्ज व मागचेही कर्ज भरले नाही. परिणामी या शेतकºयांना नवीन कर्ज मिळाले नाही. कर्ज घेणाºया शेतकºयांना विमा सक्तीचा आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांची संख्या घटल्याने विमाधारकांचीही संख्या घटली आहे. मागील वर्षी २२ हजार ९६७ कर्जधारकांनी विमा काढला होता. तर यावर्षी केवळ १६ हजार ९०३ कर्जधारकांनी विमा काढला आहे. मागील वर्षी कर्ज न घेणाºया ८१९ शेतकºयांनी विमा काढला होता. तर यावर्षी ८१५ शेतकºयांनी विमा काढला आहे. एकंदरीतच कर्ज न घेता विमा काढणाºया शेतकºयांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येते.