शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

लोकसभेच्या मताधिक्याने आमदारांची डोकेदुखी वाढली

By admin | Updated: May 24, 2014 23:34 IST

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तिनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळालेले नाहीत. उलट उमेदवार ज्या गडचिरोली

अभिनय खोपडे - गडचिरोली

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तिनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळालेले नाहीत. उलट उमेदवार ज्या गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत, त्या मतदार संघातही ६९ हजारांचा फटका काँग्रेसला बसला आहे. आरमोरी क्षेत्रातही ४२ हजारांवर तर अहेरी क्षेत्रात ४३ हजारांवर मतांचा फटका काँग्रेसला बसला आहे. आजवरचा जिल्ह्याचा इतिहास पाहता, मतदारांनी लोकसभेला दिलेला कौल विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार विधानसभेसाठी मैदानात उतरावे की नाही, याविषयी अत्यंत चिंताग्रस्त आहे.

सध्या यंदाच्या निवडणुकीतील मतांच्या आकड्यांनी काँग्रेस निपचित पडली आहे. दोन महिन्यात कसे होणार याची चिंता आमदारांना आहे. अहेरीच्या अपक्ष आमदारालाही चिंता राहणारच आहे.

लोकमत’ने १९९0 पासूनच्या लोकसभा निवडणुकींच्या मतांचा आढावा घेतला. या आढाव्यात लोकसभेचा कौलच विधानसभेला कायम राहत आला, असे दिसून आले. कधी वर्षाच्या अंतराने विधानसभा पहिले तर लोकसभा नंतर अशा निवडणूका झाल्या. तरीही मतदारांनी आपला कौल हा अबाधितच ठेवल्याचे दिसून येते. कोणत्या निवडणुकीत प्रभावी उमेदवार रिंगणात आल्यास १0 ते १५ हजारापर्यंत मतदान काँग्रेसला वाढले, असेही दिसून आले. २00४ हे वर्ष सलग निवडणुकांचे होते. तत्कालिन चिमूर क्षेत्रात काँग्रेसचा उमेदवार पंजा चिन्हावर नव्हता. त्यामुळे विधानसभेचे मताधिक्यात वाढ झाल्याचे दिसते. तसेच गडचिरोली व सिरोंचा विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र वैद्य यांनीही मोठे मताधिक्य लोकसभेत घेतले होते. त्याचा फरक या काँग्रेसच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या मतधिक्यावर पडला. विधानसभेला काँग्रेसने तुळशिराम पाटील पोरेटी यांच्यासारखे प्रभावी व नवा उमेदवार पक्षाने दिला होता. त्यामुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडी दिसते, ही या मागचे प्रमुख कारणे आहे, असे राजकीय जाणकार मानतात.२00९ मध्ये म्हणजेच लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या मताधिक्यात १३ हजार ७00 मतांचा फरक आहे. विधानसेला काँग्रेसची मते गडचिरोली विधानसभा क्षेत्रात वाढली. मात्र काँग्रेसचा केवळ मात्र ९६0 मतांनी विजयी झाली. या चार ते पाच निवडणुकांचे मताधिक्य व मतदारांचा बदलणारा कौल पाहता, २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात बसलेला फटका लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षासाठी फार चांगली परिस्थिती राहण्याची शक्यता दिसत नाही. १0 ते १५ हजार मतांचे आकडे मागे-पुढे होऊ शकतात. परंतु ३0 हजाराच्या वरील मतांचे अंतर कापणे हे कठीण जाणारी बाब आहे, असे राजकीय अभ्यासकही मानतात.