शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा त्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:14 IST

१ नोव्हेंबर २००५ नंतर शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या सर्व विभागाच्या कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नवीन अंशदायी निवृत्ती योजनेचा....

ठळक मुद्देयोजना अन्यायकारक : जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाºयांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : १ नोव्हेंबर २००५ नंतर शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या सर्व विभागाच्या कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नवीन अंशदायी निवृत्ती योजनेचा महाराष्टÑ राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना तालुका शाखा कुरखेडाच्या पदाधिकाºयांनी त्याग केला असून याबाबतचे त्यागपत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे व तालुकाध्यक्ष गणेश आखाडे यांच्या नेतृत्वात विभाग प्रमुखांना दिले.अंशदायी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत कर्मचाºयांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. या योजनेंतर्गत कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के रक्कम कपात केली जात आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत स्वत:चा वाटा जमा केला नाही. त्यामुळे अंशदायी रकमेचा मेळ जुडत नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये २० पेक्षा जास्त कर्मचाºयांचा मृत्यू झाला. त्यांचे निवृत्ती वेतन व त्या विषयीच्या लाभाचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. मात्र शासनाने सदर प्रस्ताव परत पाठविले आहे. कर्मचाºयांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या कुटुंबाला लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारची योजना कोणत्याच कामाची नाही. शनिवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे व तालुकाध्यक्ष गणेश आखाडे यांच्या नेतृत्वातील सर्व कर्मचाºयांनी नवीन योजनेचा त्याग करीत वैयक्तिक त्याग पत्र कार्यालय प्रमुखांना सादर केले. यावेळी नेपाल वालदे, प्रविण मेश्राम, सुधीर गद्देवार, तुळशीराम नरोटे, पत्तीराम औरासे, देवा घोडमारे, चांदेकर, वडेट्टीवार, रवींद्र गावंडे, दीपक ढबाले, अल्का कुमरे, बगडे, विकास नाकाडे, संजय राऊत, सदाशिव कुमरे, सुधाकर नेवारे, मुलचंद शिवणकर, मुंडे, गट्टूकर, देवा हलामी, सिडाम उपस्थित होते.