शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

पेटतळा गाव पेसातून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:10 IST

घोट परिसरातील पेटतळा गावात आदिवासी नागरिकांची केवळ २० टक्के लोकसंख्या असून ८० टक्के नागरिक इतर समाजाच्या आहेत.

ठळक मुद्देगावकºयांची मागणी : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट परिसरातील पेटतळा गावात आदिवासी नागरिकांची केवळ २० टक्के लोकसंख्या असून ८० टक्के नागरिक इतर समाजाच्या आहेत. त्यामुळे पेटतळा ही ग्रामपंचायत पेसा कायद्यातून वगळण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली असून याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले असल्याची माहिती ७ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.पेटतळाची ग्रामपंचायत १९६१ साली निर्माण करण्यात आली. तेव्हापासून येथील सर्वच समाजाचे नागरिक एकजुटीने राहत होते. १३ मार्च २०१४ रोजी सदर गाव पेसा अंतर्गत समाविष्ट असल्याचे परिपत्रक निघाल्यानंतर नागरिकांना आश्चार्याचा धक्काच बसला. या गावात केवळ २० टक्के आदिवासी नागरिक आहेत व ८० टक्के नागरिक इतर समाजाचे आहेत. २६ जानेवारी २०१५ रोजी ग्रामसभेत पेसा कायद्यातून ग्रामपंचायत वगळण्यात यावी, असा ठराव घेतला. २० फेब्रुवारी रोजी पुन्हा पेसा कायद्याचा ठराव बहुमताने नामंजूर करण्यात आला. २ मार्च २०१७ रोजी तेंदूपत्त्याचा लिलाव करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या उद्देशाने ग्रामसभा बोलविली होती. या सभेतही ठराव नामंजूर झाला. ८ एप्रिल २०१७ रोजी पेसा अंतर्गत तेंदूपत्ता संकलन न करता वन व्यवस्थापन समितीमार्फत तेंदूपत्ता संकलन करण्यात यावा, असा ठराव घेतला. तरीही पेसा अंतर्गत तेंदूपत्त्याचा लिलाव करून कंत्राट देण्यात आले. २४ आॅगस्ट २०१७ रोजी ग्रामसभेने पुन्हा पेटतळा हे गाव पेसातून वगळण्याबाबत ठराव घेतला. या ग्रामसभेच्या वेळी प्रोसेडींग न लिहिताच स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न सरपंच व सचिव यांनी केला. त्यामुळे या ग्रामसभेत फार मोठा तणाव निर्माण झाला होता. पेसामध्ये गाव असल्याने या गावातील ८२ टक्के नागरिकांवर अन्याय होत आहे. नागरिकांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.सदर गाव पेसापासून वगळण्यात यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून नागरिकांनी केली आहे. पत्रकार परिषदेला पेटतळाचे माजी सरपंच रमेश कन्नाके, वामन बर्लावार, परमेश्वर बर्लावार, मानिकराम बर्लावार, अशोक येनगंटीवार, दिलीप मुसेट्टीवार, लक्ष्मण कोसरे, तुळशीराम तुंकलवार, विशाल बोल्लीवार, लसमा चौधरी, गंगाधर तुंकलवार, गोविंदराव मोहुर्ले, आनंदराव चौधरी, संभांजी तुंकलवार, पूजा शेट्टीवार, भारती बर्लावार, यामिनी तुंकलवार, लोकीता तुंकलवार, गयाबाई अंबेलवार, हिवराज गोटेवार उपस्थित होते.