शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

इटियाडोहचे पाणी शिवणी परिसरात सोडा

By admin | Updated: October 20, 2015 01:36 IST

शिवणी, सायगाव, वघाळा, अतरंजी, पालोरा या गावातील २०० हेक्टर क्षेत्रावरील धान पीक करपले असून या

आरमोरी/जोगीसाखरा : शिवणी, सायगाव, वघाळा, अतरंजी, पालोरा या गावातील २०० हेक्टर क्षेत्रावरील धान पीक करपले असून या क्षेत्रात तत्काळ पाणी सोडावे, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी इटियाडोह पाटबंधारे विभागाचे अभियंता मेंढे यांना दिले आहेत. इटियाडोह धरणाचे पाणी सुटून एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र शिवणी, सायगाव, वघाळा, अतरंजी, पालोरा या गावातील शेतीकडे जाणाऱ्या कालव्याला पाणीच सोडण्यात आले नाही. दहा दिवसांपूर्वी इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याची शेतकऱ्यांनी भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही या कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही. महिनाभरापासून पाणी न मिळाल्याने सुमारे २०० हेक्टरवरील धान पीक करपले आहे. तर हजारो हेक्टरवरील धान कोमेजायला लागले आहे. ही बाब शेतकऱ्यांनी आ. क्रिष्णा गजबे यांच्या लक्षात आणून दिली. आमदारांनी इटियाडोह पाटबंधारे विभागावर धडक दिली व कालव्याला पाणी का सोडण्यात आले नाही. याबाबत अभियंता मेंढे यांना जाब विचारला. पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने शेवटपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याची बाब अभियंत्याच्या लक्षात आणून दिली. स्वत: नियोजन करून व उपस्थित राहून प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल, याची व्यवस्था करावे, असे निर्देश आमदारांनी दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, सदानंद कुथे, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, राहूल तितीरमारे, नामदेव सोरते, मनोज मने, बाळा बोरकर, चंद्रभान निंबेकार, हारगुळे आदींसह परिसरातील शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)