शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रताळांवर प्रक्रिया करायला शिका

By admin | Updated: March 19, 2017 01:53 IST

गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व शेती रताळाच्या पिकासाठी लाभदायक असल्याने येथील रताळाला संपूर्ण विदर्भात चांगली मागणी आहे.

कंदमुळे महोत्सव व कृषी मेळावा: व्ही. जे. तांबे यांचे प्रतिपादन गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व शेती रताळाच्या पिकासाठी लाभदायक असल्याने येथील रताळाला संपूर्ण विदर्भात चांगली मागणी आहे. रताळावर प्रक्रिया करून वेगवेगळे खाद्य पदार्थ तयार केल्यास रताळाला आजच्या तुलनेत १० पट अधिक किंमत मिळेल. नागरिकांनाही रोजगाराचे अतिरिक्त साधन उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता कृषी मेळावा व कंदमुळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. जे. तांबे होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रगतशील शेतकरी डॉ. मुनघाटे, अनिल पाटील म्हशाखेत्री, आत्माच्या उपसंचालक प्रिती हिरडकर, प्रतीभा चौधरी, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, लभानतांडा येथील महिला शेतकरी विभा रामटेके, लक्ष्मीराम गुलफो, बाबुराव साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील लभानतांडा येथे जवळपास २० हेक्टरवर रताळांची लागवड केली जाते. मात्र रताळांना योग्य किंमत मिळत नसल्याने येथील शेतकरी हळूहळू रताळांची शेती सोडून देत आहेत. रताळाला चांगली किंमत मिळावी, त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्र गावातील शेतकऱ्यांना तसेच बचत गटांना उपलब्ध व्हावे व त्याची विक्री व्हावी, या उद्देशाने कंदमुळे महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवादरम्यान रताळापासून बनणारी अनेक खाद्य पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आली होती. ब्रॅन्डेड कंपन्यांच्या खाद्य पदार्थांच्या तुलनेत स्वत: तयार केलेली खाद्य पदार्थ स्वस्त व चांगली राहतात. ही बाब पटवून देण्यात आली. रताळांमध्ये विटॅमिन, प्रथीने, कॅरोटीन, मॅग्नेशीअम, फॉलिक अ‍ॅसीड व पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात राहत असल्याने सदर रताळे आरोग्यवर्धक मानली जातात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) योगीता सानप तर आभार अनिल तारू यांनी मानले. यशस्वीतेसाठी विषय विशेषज्ञ डॉ. विक्रम कदम, पुष्पक बोथीकर, ज्ञानेश्वर ताथोड, अनिल तारू, मयूर बेलसरे, दीपक चव्हान, सुनिल थोटे, ज्योती परसुटकर, गजेंद्र मानकर, हितेश राठोड, नेशन टेकाम, प्रमोद भांडेकर, प्रविण नामुर्ते, जितेंद्र कस्तुरे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)