शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

विदर्भाच्या मागासलेपणाला पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:12 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी काँग्रेस राजवटीच्या काळात विदर्भावर विकासाबाबत सातत्याने अन्याय केला.

प्रकाश इटनकर यांचा आरोप : विरोध काँग्रेसला महाग पडणार गडचिरोली : पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी काँग्रेस राजवटीच्या काळात विदर्भावर विकासाबाबत सातत्याने अन्याय केला. विदर्भाला दूजाभावाची वागणूक दिली. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिलेला आहे. सिंचन, रस्ते याचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. याला पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी जबाबदार असल्याचे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश इटनकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही सर्वात जुनी मागणी असून हा विषय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे अनेकदा मांडण्यात आला. अनेक आंदोलने झालीत. भारतीय जनता पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशात स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा हा महत्त्वाचा राहिला आहे. या मुद्यामुळेच त्यांना विदर्भात चांगले यश आले. मात्र सरकार आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आता खोटी ठरत आहे, असे जनतेच्या लक्षात आले आहे. विधानसभा व विधान परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाला केलेला विरोध हा विदर्भातील शेकडो काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा अपमान आहे, असेही इटनकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र विदर्भाबाबत जनमंच या संस्थेने सर्व भागात सर्वेक्षण केले. ९५ टक्के लोक स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजुने आहेत. असे असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विदर्भाच्या मागणीला विरोध करू नये, अन्यथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वैदर्भीय जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही इटनकर यांनी म्हटले आहे.