शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

विदर्भाच्या मागासलेपणाला पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:12 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी काँग्रेस राजवटीच्या काळात विदर्भावर विकासाबाबत सातत्याने अन्याय केला.

प्रकाश इटनकर यांचा आरोप : विरोध काँग्रेसला महाग पडणार गडचिरोली : पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी काँग्रेस राजवटीच्या काळात विदर्भावर विकासाबाबत सातत्याने अन्याय केला. विदर्भाला दूजाभावाची वागणूक दिली. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिलेला आहे. सिंचन, रस्ते याचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. याला पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी जबाबदार असल्याचे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश इटनकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही सर्वात जुनी मागणी असून हा विषय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे अनेकदा मांडण्यात आला. अनेक आंदोलने झालीत. भारतीय जनता पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशात स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा हा महत्त्वाचा राहिला आहे. या मुद्यामुळेच त्यांना विदर्भात चांगले यश आले. मात्र सरकार आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आता खोटी ठरत आहे, असे जनतेच्या लक्षात आले आहे. विधानसभा व विधान परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाला केलेला विरोध हा विदर्भातील शेकडो काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा अपमान आहे, असेही इटनकर यांनी म्हटले आहे. स्वतंत्र विदर्भाबाबत जनमंच या संस्थेने सर्व भागात सर्वेक्षण केले. ९५ टक्के लोक स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजुने आहेत. असे असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विदर्भाच्या मागणीला विरोध करू नये, अन्यथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वैदर्भीय जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही इटनकर यांनी म्हटले आहे.