शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष यात्रेतील विरोधी पक्ष नेत्यांनी फिरविली गडचिरोलीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:03 IST

महाराष्ट्रातील सर्वात समस्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे कर्जमुक्तीच्या निमित्ताने

शेतकऱ्यांचा भ्रमनिराश : कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त आत्महत्यागडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वात समस्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे कर्जमुक्तीच्या निमित्ताने विरोधी पक्षाने काढलेल्या संघर्ष यात्रेने पाठ फिरविल्याने या जिल्ह्यातील सर्व सामान्य शेतकरी व नागरिकांचा मोठा भ्रमनिराश झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारी विरोधी पक्षाची संयुक्त कर्जमुक्तीची संघर्ष यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातून सुरूवात करण्यात आली. ही यात्रा मागास गडचिरोली जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काढली असती तर या भागातील सिंचन, वीज व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्यांना समजल्या असत्या. नक्षलग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नही या निमित्ताने विरोधी पक्ष नेत्यांना जाणून घेता आले असते, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गडचिरोली माजी पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्यामध्ये ही संवेदनशीलता होती. त्यांनी या भागातील लोकांचे अश्रू पुसण्याचे काम पोटतिडकीने केले. सोबतच या भागाच्या विकासाची धूराही स्वत:वर लादून घेतली. हा भाग मुंबई, पुण्यापेक्षा ५० वर्ष मागे आहे, असे आर. आर. पाटील नेहमीच म्हणायचे. स्वत: आर. आर. पाटील यांनी पालकमंत्री असताना विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांना सिरोंचा व अहेरी येथे नेऊन तेथील अडचणीबाबत अवगत करून दिले होते. एवढेच नव्हे तर अहेरी येथे आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेतली. त्यांनाही सर्वसामान्याच्या अडचणी समजावून देण्याचे काम केले होते. एवढी संवेदनशीलता सध्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये व आमदारांमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी चांदा ते बांदा अशी यात्रा काढून ेगडचिरोली जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात २००३ पासून ५० वर अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चामोर्शी तालुक्याच्या घारगाव येथे ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे असताना संघर्ष यात्रा गडचिरोलीत आली नाही. याची खंत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)