शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष यात्रेतील विरोधी पक्ष नेत्यांनी फिरविली गडचिरोलीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:03 IST

महाराष्ट्रातील सर्वात समस्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे कर्जमुक्तीच्या निमित्ताने

शेतकऱ्यांचा भ्रमनिराश : कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त आत्महत्यागडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वात समस्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याकडे कर्जमुक्तीच्या निमित्ताने विरोधी पक्षाने काढलेल्या संघर्ष यात्रेने पाठ फिरविल्याने या जिल्ह्यातील सर्व सामान्य शेतकरी व नागरिकांचा मोठा भ्रमनिराश झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारी विरोधी पक्षाची संयुक्त कर्जमुक्तीची संघर्ष यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातून सुरूवात करण्यात आली. ही यात्रा मागास गडचिरोली जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काढली असती तर या भागातील सिंचन, वीज व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्यांना समजल्या असत्या. नक्षलग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नही या निमित्ताने विरोधी पक्ष नेत्यांना जाणून घेता आले असते, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गडचिरोली माजी पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्यामध्ये ही संवेदनशीलता होती. त्यांनी या भागातील लोकांचे अश्रू पुसण्याचे काम पोटतिडकीने केले. सोबतच या भागाच्या विकासाची धूराही स्वत:वर लादून घेतली. हा भाग मुंबई, पुण्यापेक्षा ५० वर्ष मागे आहे, असे आर. आर. पाटील नेहमीच म्हणायचे. स्वत: आर. आर. पाटील यांनी पालकमंत्री असताना विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांना सिरोंचा व अहेरी येथे नेऊन तेथील अडचणीबाबत अवगत करून दिले होते. एवढेच नव्हे तर अहेरी येथे आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेतली. त्यांनाही सर्वसामान्याच्या अडचणी समजावून देण्याचे काम केले होते. एवढी संवेदनशीलता सध्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये व आमदारांमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी चांदा ते बांदा अशी यात्रा काढून ेगडचिरोली जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात २००३ पासून ५० वर अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चामोर्शी तालुक्याच्या घारगाव येथे ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे असताना संघर्ष यात्रा गडचिरोलीत आली नाही. याची खंत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)