शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

मुख्याधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती

By admin | Updated: November 19, 2015 02:03 IST

नागरिकांच्या समस्यांचे वेळीच निराकरण करण्यासाठी तसेच नागरी प्रशासन सुव्यवस्थित राहण्यासाठी संबंधित

नगर विकास सचिवांचे आदेश : शिस्तभंगाची कारवाई होणारगडचिरोली : नागरिकांच्या समस्यांचे वेळीच निराकरण करण्यासाठी तसेच नागरी प्रशासन सुव्यवस्थित राहण्यासाठी संबंधित नगर परिषदा व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले असून, तसे आदेश नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांनी बुधवारी निर्गमित केले आहेत.नागरी कायद्यानुसार नुसार प्रत्येक नगर परिषद व नगर पंचायतीसाठी मुख्याधिकारी नेमण्याची तरतूद आहे. मुख्याधिकारी हा संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रशासकीय प्रमुख असतो. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचा जीवनावश्यक व दैनंदिन कामानिमित्त स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेशी सातत्याने संबंध येत असतो. या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख या नात्याने मुख्याधिकाऱ्याने नागरिकांच्या समस्यांचे वेळीच निराकरण करणे व नागरी प्रशासन सुव्यस्थित राखणे आवश्यक असते. यासाठी संबंधित नगर परिषद व नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्याने मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. तसेच विनापरवानगीने मुख्यालय सोडणे अनूचित आहे. त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याबाबत शासनाने १५ आॅक्टोबर २०१५ च्या परिपत्रकानुसार स्थायी आदेश दिलेले आहेत मात्र अनेक मुख्याधिकारी शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून मुख्यालयी वास्तव्य न करता अन्य विभागीय वा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणाहून ये-जा करीत असतात, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिक नागरी समस्यांचे निराकरण होत नाही व नागरिकांची गैरसोय होते. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य असल्याचे नगर विकास विभागाच्या सचिवांनी आदेशात म्हटले आहे. जे मुख्याधिकारी मुख्यालयी वास्तव्य करीत नाही, त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याविषयीचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशी सूचनाही सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.