शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

कायदा कागदावरच

By admin | Updated: June 12, 2014 00:00 IST

अल्पवयात बाल कामगाराला कामासाठी प्रवृत्त केल्याने तो शिक्षणाच्या संधी, बालसुलभ खेळ व करमणूक यापासून वंचित राहते. रात्रंदिवस काम केल्याने त्याची शारीरिक वाढ खुंटून त्याच्या व्यक्तीमत्व विकासास

समस्या : बाल कामगारदिगांबर जवादे - गडचिरोलीअल्पवयात बाल कामगाराला कामासाठी प्रवृत्त केल्याने तो शिक्षणाच्या संधी, बालसुलभ खेळ व करमणूक यापासून वंचित राहते. रात्रंदिवस काम केल्याने त्याची शारीरिक वाढ खुंटून त्याच्या व्यक्तीमत्व विकासास अडचण निर्माण होते. एकप्रकारचे त्याचे बालपण हरवते. धोकादायक ठिकाणी काम केल्याने त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता राहते. असे झाल्यास देशाची भावी पिढी कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी १९८६ साली बालकामगार कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्यात १४ वर्षाखालील मुलाला कामावर ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र कायदा असूनही शहरात व ग्रामीण भागातसुद्धा बालकामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे बाल कामगार कायदा केवळ कागदावरच आहे, अशी टिकाही सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आजही बहुतांश मुलं चहाच्या टपरीवर ‘साहेब’ म्हणत चहा वाटत आहेत. बांधकामावर विटांची टोपली धरून तर बसस्थानकावर बुट पॉलीश करतांना बालकामगार दिसून येतात. गडचिरोली जिल्ह्यातील स्थितीगडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे बाल कामगारांची संख्यादेखील जास्त आहे. मुलगा काम करण्यालायक झाल्याबरोबर त्याचे आई-वडील त्याला काम करण्याची सक्ती करतात. विशेष करून तेंदूपत्ता हंगामात तेंदूपत्ता कंत्राटदार लहान मुलांकडून तेंदूपुडा पलटविण्याचे काम करून घेतात. गडचिरोली, देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी या शहरांमध्ये असलेल्या दुकानांमध्येही बाल कामगार दिसून येतात.कामगार कार्यालयाची कारवाईगडचिरोली येथे स्वतंत्र सरकारी कामगार अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अखत्यारितच बाल कामगार हा विषय येतो. या कार्यालयाने ९ फेब्रुवारी २०१२ ते ४ फेब्रुवारी २०१४ पर्यंत एकूण ९ धाडी टाकल्या असून यामध्ये १४ वर्षाखालील चार मुले आढळून आली आहेत. या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. बाल कामगारांची संख्या लक्षात घेता, केलेली कारवाई नगण्य असल्याची टिका होत आहे.१४ वर्षाखालील एखादा बालक स्वत:च्या दुकानात काम करीत असेल तर तो कायद्यानुसार तो बाल कामगार ठरू शकत नाही. औद्योगिकरण व शहरी करण कमी असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बाल कामगारांची संख्या कमी आहे. उन्हाळ्यात मुलांना सुटी राहत असल्याने काही मुले शहरात येऊन दुकानामध्ये नोकर राहतात. या कालावधीत बाल कामगारांची संख्या वाढते.- प्रभाकर राऊत, दुकान निरीक्षक, कामगार अधिकारी कार्यालय