शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ

By admin | Updated: October 1, 2014 23:23 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात २ ते ३० आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छ भारत अभियान राबविला जात असून या अभियानाची सुरूवात आरमोरी येथील महात्मा गांधी कला,

आरमोरी : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात २ ते ३० आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छ भारत अभियान राबविला जात असून या अभियानाची सुरूवात आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात १ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. भारत सरकारचा मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महात्मा गांधी जयंतीच्या पूर्व संधेला महाविद्यालयाच्या इमारतीची व परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियान २ ते ३० आॅक्टोबर दरम्यान राबविल्या जाणार आहे. या कालावधीत ग्रामस्वच्छता, स्वच्छताविषयक प्रतिज्ञा, भित्तीचित्र प्रदर्शनी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा, सार्वजनिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन या संदर्भात प्रकल्प निर्मिती, व्याख्यानसत्र, परिसंवाद, पथनाट्य, स्वच्छता रॅली, गांधी संस्कार परीक्षा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात राबविले जाणार आहेत. १ आॅक्टोबर रोजीचे स्वच्छता अभियान राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे, प्रा. अमिता बन्नोरे, प्रा. डॉ. विजय गोरडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. सदर अभियान यशस्वीतेसाठी डॉ. गोपाल तामगाडे, डॉ. विशाखा वंजारी, प्रा. सुरेश रेहेपाडे, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. डॉ. रमेश ठोंबरे, प्रा. किशोर हजारे, प्रा. जयेश पापडकर, प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. पराग मेश्राम, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. डॉ. वसंता कहालकर, प्रा. डॉ. विजय रैवतकर, हिरालाल मगरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. घर व परिसरात असलेल्या अस्वच्छतेमुळे अनेक रोगांचा प्रसार होतो. मात्र याबाबत नागरिकांमध्ये फारशी जनजागृती निर्माण झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रत्येक महाविद्यालयाला सदर कार्यक्रम राबविणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात स्वच्छतेची मोहीम छेडली जाणार आहे. याचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)