शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने लोह प्रकल्पांना चालना

By admin | Updated: November 21, 2015 01:53 IST

मागील दहा ते पंधरा वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात लोह प्रकल्पाचे काम रखडलेले होते. माओवाद्यांच्या दहशतीमुळे या भागात येण्यास उद्योजक तयार होत नव्हते. माओवाद्यांनी काही उद्योजकांची हत्याही केली.

लक्ष्मी मित्तल यांना गडचिरोलीसाठी आमंत्रण : १० ते १५ वर्षांपासून रखडला सूरजागड प्रकल्पगडचिरोली : मागील दहा ते पंधरा वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात लोह प्रकल्पाचे काम रखडलेले होते. माओवाद्यांच्या दहशतीमुळे या भागात येण्यास उद्योजक तयार होत नव्हते. माओवाद्यांनी काही उद्योजकांची हत्याही केली. त्यामुळे अनेकांनी लीज मिळूनही या भागातून आपला गाशा गुंडाळला होता. राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाल्यावर गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी पुढाकार घेण्यात आला. अलिकडेच लंडन भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भेट घेतली व त्यांना गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी आमंत्रित केल्याची माहिती टिष्ट्वटवरून दिली. त्यामुळे गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला आता आगामी काळात चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली, सूरजागड, कोरची तालुक्यात झेंडेपार, मसेली, अहेरी तालुक्यात देवलमरी आदी भागात लोह खनिज व सिमेंटचे साठे आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन केंद्र सरकारने दहा वर्षांपूर्वी या भागात उद्योजकांना लोह खनिजासाठी लीज मंजूर केली होती. काही उद्योजकांनी येथे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माओवाद्यांचा याबाबीला विरोध राहिला. अशातच दोन उद्योजकांची हत्या झाली. त्यामुळे या भागात लीज घेतलेल्या लोहखनिज कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आॅगस्ट २०१५ मध्ये दिल्ली येथे गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाबाबत बैठक आयोजित केली. उद्योजकांना पोषण वातावरण निर्माण करण्यासाठी गृह विभाग आवश्यक ते सहकार्य राज्य सरकारला करेल, असे सुतोवाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्याशी मुंबई येथे बैठक घेऊन त्यांना गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याबाबत आमंत्रित केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने एटापल्ली, भामरागड व एकूणच नक्षलग्रस्त भागात पोषण वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले आहे. या भागात येत्या काही दिवसात पॅरामिल्ट्री फोर्सेस तैनात केले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अलिकडे लंडन येथे मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मी मित्तल या उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना सूरजागड भागात लोहखनिज उद्योग सुरू करण्यासाठी साकडे घातले. गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे मार्ग तसेच रस्ते विकासाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलले आहे. जानेवारी महिन्यात रेल्वे मार्ग व महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करून आगामी तीन वर्षात हे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औद्योगिक वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे पुढील काळात गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता जानकारांकडून व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)