शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

वर्षभरापासून रखडले स्मशानभूमीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:58 IST

स्थानिक गडचिरोली नगर परिषदेने कठाणी नदीवर लाखो रूपये खर्चून स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे.

ठळक मुद्देइमारत पूर्ण : बोअरवेल खोदण्यासाठी लागले एक वर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गडचिरोली नगर परिषदेने कठाणी नदीवर लाखो रूपये खर्चून स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र स्मशानभूमीच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला नसल्याने अंत्यविधी नदीतच पार पाडावे लागत आहेत.गडचिरोली शहरातील बहूतांश अंत्यविधी कठाणी नदीच्या पात्रात पार पाडले जातात. अंत्यविधीनंतर जमा झालेली राख नदीच्या पाण्यात ढकलली जाते. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी वापरली जाणारी पूजेची व इतर सामग्री नदीच्या पाण्यातच सोडली जाते. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पावसाळ्यात नदीत पाणी राहत असल्याने अंत्यविधी नदीकाठावरच आटोपावे लागत होते. त्यातही दिवसभर पाऊस असल्यास मृतदेह जाळण्यास अडचण होत होती.या सर्व अडचणी लक्षात घेऊन नगर परिषदेने स्थानिक विकास फंडातून अंत्यविधी पार पाडण्यासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. यावर लाखो रूपये खर्च झाले. इमारतींचे बांधकाम एक वर्षापूर्वीच पूर्ण झाले. मात्र या ठिकाणी बोअरवेल नसल्याचे कारण पुढे करून लोकार्पण केले नाही. तब्बल एक वर्षांनतर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला या ठिकाणी बोअरवेल खोदला आहे. बोअरवेलमध्ये पाणीपंपही टाकला आहे. स्माशनभूमीत वीज जोडणीचे कामही झाले आहे. इमारतीच्यावर पाणी टाकी बसवून त्यामध्ये पाणी टाकले जाणार आहे. मात्र अजूनपर्यंत पाणीटाकी बसविण्यात आली नाही. उर्वरित काम करण्यास आणखी किती दिवस लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशी आहे स्मशानभूमीस्मशानभूमीत दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. यातील पहिली इमारत अंत्यविधीसाठी आलेल्यांना थांबण्यासाठी आहे. तर दुसऱ्या इमारतीत मृतदेह जाळण्याठी तीन लोखंडी कठडे तयार करण्यात आले आहेत.विश्रांतीसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीत टाईल्स लावण्यात आल्या आहेत. या टाईल्स लोकार्पणापूर्वीच निघाल्या आहेत. त्यामुळे त्या चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या टाईल्स पून्हा बसविणे आवश्यक आहे.