शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

वर्षभरापासून रखडले स्मशानभूमीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:58 IST

स्थानिक गडचिरोली नगर परिषदेने कठाणी नदीवर लाखो रूपये खर्चून स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे.

ठळक मुद्देइमारत पूर्ण : बोअरवेल खोदण्यासाठी लागले एक वर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गडचिरोली नगर परिषदेने कठाणी नदीवर लाखो रूपये खर्चून स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र स्मशानभूमीच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडला नसल्याने अंत्यविधी नदीतच पार पाडावे लागत आहेत.गडचिरोली शहरातील बहूतांश अंत्यविधी कठाणी नदीच्या पात्रात पार पाडले जातात. अंत्यविधीनंतर जमा झालेली राख नदीच्या पाण्यात ढकलली जाते. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी वापरली जाणारी पूजेची व इतर सामग्री नदीच्या पाण्यातच सोडली जाते. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पावसाळ्यात नदीत पाणी राहत असल्याने अंत्यविधी नदीकाठावरच आटोपावे लागत होते. त्यातही दिवसभर पाऊस असल्यास मृतदेह जाळण्यास अडचण होत होती.या सर्व अडचणी लक्षात घेऊन नगर परिषदेने स्थानिक विकास फंडातून अंत्यविधी पार पाडण्यासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. यावर लाखो रूपये खर्च झाले. इमारतींचे बांधकाम एक वर्षापूर्वीच पूर्ण झाले. मात्र या ठिकाणी बोअरवेल नसल्याचे कारण पुढे करून लोकार्पण केले नाही. तब्बल एक वर्षांनतर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला या ठिकाणी बोअरवेल खोदला आहे. बोअरवेलमध्ये पाणीपंपही टाकला आहे. स्माशनभूमीत वीज जोडणीचे कामही झाले आहे. इमारतीच्यावर पाणी टाकी बसवून त्यामध्ये पाणी टाकले जाणार आहे. मात्र अजूनपर्यंत पाणीटाकी बसविण्यात आली नाही. उर्वरित काम करण्यास आणखी किती दिवस लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशी आहे स्मशानभूमीस्मशानभूमीत दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. यातील पहिली इमारत अंत्यविधीसाठी आलेल्यांना थांबण्यासाठी आहे. तर दुसऱ्या इमारतीत मृतदेह जाळण्याठी तीन लोखंडी कठडे तयार करण्यात आले आहेत.विश्रांतीसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीत टाईल्स लावण्यात आल्या आहेत. या टाईल्स लोकार्पणापूर्वीच निघाल्या आहेत. त्यामुळे त्या चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या टाईल्स पून्हा बसविणे आवश्यक आहे.