शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

अखेर पोषण आहारासाठी शाळांना तांदळाचा पुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:13 IST

जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहाराचा दोन महिन्यांपासून पुरवठाच झाला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभाग खळबळून जागा झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात तांदूळ टंचाई : नागपूरवरून ३५० मेट्रिक टनची उचल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहाराचा दोन महिन्यांपासून पुरवठाच झाला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभाग खळबळून जागा झाला. जिल्ह्यातील गोदामांमध्ये तांदूळ उपलब्ध नसल्यामुळे नागपूर येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामातून ३५० मेट्रिक टन तांदळाची उचल करण्यात आली. हा तांदूळ आता शाळास्तरावर पुरवठा करणे सुरू झाले आहे.जिल्ह्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या मिळून १७८७ शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत १ लाख १९६ विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहाराची योजना सुरू आहे. पण यावर्षी राज्य स्तरावर शालेय पोषण आहार पुरवठ्याचे कंत्राटच दिल्या गेले नाही. मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर पोषण आहारासाठी लागणाºया साहित्याची खरेदी करून नंतर बिल सादर करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी केल्या असल्या तरी त्यासाठी मुख्याध्यापक तयार नाहीत. विशेष म्हणजे तांदळाचा पुरवठा जिल्हास्तरावरच शासकीय गोदामांमधून करण्याचे निर्देश आहेत. परंतू वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये तांदूळच उपलब्ध नसल्याचे सांगत गेल्या दोन महिन्यांत बहुतांश शाळांमध्ये तांदळाचा पुरवठा झाला नाही.‘लोकमत’ने ४ नोव्हेंबरच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित करून तांदूळ पुरवठ्यात गडबड होत असल्याचे निदर्शनास आणताच प्रशासकीय यंत्रणा सावध झाली. लगेच नागपूर येथील भारतीय खाद्य निगममधून ३५० मे.टन तांदळाची उचल करून जिल्ह्यातील शाळांना तो तांदूळ पुरवठा करण्याचे निर्देश वाहतूकदाराला देण्यात आले. त्यानुसार दोन दिवसांपासून तांदळाचा पुरवठा करणे सुरू झाले आहे.या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तांदळाचा पुरवठा होईल असे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले. तांदूळ मिळाले तरी इतर साहित्याचा पुरवठा अजूनही अधांतरीच आहे.‘लोकमत’च्या बातम्यांवरूनशिक्षण संचालकांना पत्रराज्यस्तरावर पोषण आहार पुरवठ्याचा कंत्राट दिवाळीपर्यंत होईल असे आधी सांगण्यात आले होते. तोपर्यंत मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर किराणा साहित्याची जुळवाजुळव करून पोषण आहार पुरवावा असे सांगण्यात आले. मात्र त्याबाबत मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी आधीच असमर्थता दर्शविली. आता दिवळी आटोपली तरी पोषण आहाराचा पत्ता नसल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लोकमतने बातम्या लावताच त्या बातम्यांच्या कात्रणासह जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांना पत्र लिहून पोषण आहारावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.तांदळाची टंचाई कशी?गेल्यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित तांदळाचा पुरवठा ४ ते ५ जिल्ह्यांना करण्यात आला. मात्र काही महिन्यात गडचिरोलीतच तांदळाचा तुटवडा कसा निर्माण झाला? जर या जिल्ह्याला पुरेल एवढ्या तांदळाचे उत्पादन झाले नव्हते तर येथील तांदूळ इतर जिल्ह्यांना पुरवठा करण्याची गरज होती का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या संदर्भात वखार महामंडळाच्या अधिकाºयांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल सतत बंद असल्याचे दिसून आले. दरम्यान तांदळाचा साठा आणि शेतकºयांकडून खरेदी केलेल्या धानाचा साठा करण्यासाठी जिल्ह्यात अजूनही शासकीय गोदामांची कमतरता असून प्रशासकीय यंत्रणा गोदाम बांधकामाबाबत कमालीची उदासीन दिसत आहे.