शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

ब्रेक टेस्ट ट्रॅक अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:34 IST

गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली.

ठळक मुद्दे३.४० हेक्टरवर निर्मिती : जानेवारीपासून कामाला सुरुवात; ६६ लाखांचा निधी मंजूर

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.गोंडवाना विद्यापीठाच्या जवळ उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र जमिनीबाबतचा वाद निर्माण झाल्याने ट्रॅक बनविण्याचे काम थांबले होते. गडचिरोली येथे ट्रॅक नसल्याने येथील जड वाहनांना टेस्टसाठी चंद्रपूर, भंडारा किंवा नागपूर येथे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली येथील जड वाहने पासिंगसाठी चंद्रपूर, भंडारा किंवा नागपूर येथे नेली जात होती. या तिन्ही जिल्ह्यांचे अंतर गडचिरोलीपासून १०० किमीपेक्षा अधिक असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून ट्रॅकसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.जिल्हाधिकाऱ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या जवळच ३.४० हेक्टर आर. जमीन उपलब्ध करून दिली आहे. ट्रॅक बनविण्यासाठी शासनाने ६६ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. जानेवारीपासून ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. काम अतिशय गतीने सुरू असून लवकरच काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांसाठी सोयीचे होणार आहे.सदर ट्रॅक अत्याधुनिक पद्धतीने बनविला जात असल्याने वाहनांची ब्रेक टेस्ट अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. जिल्ह्यातच ट्रॅक झाल्याने वाहनधारकांचा पासिंगवर होणारा अनावश्यक खर्चावर प्रतिबंध लागणार आहे. काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे काम उत्तम दर्जाचे होण्याची अपेक्षा आहे.वाहनधारक होते त्रस्तगडचिरोली येथे वाहनांना पासिंग देण्याचे काम बंद झाल्यानंतर वाहने चंद्रपूर, नागपूर, किंवा भंडारा येथे नेली जात होती. बºयाचवेळा वाहनाला पासिंग नसल्याचे कारण सांगून संबंधित जिल्ह्यातील वाहतूक पोलीस वाहन पकडत होते. एका दिवशी पासिंगचे काम होत नसल्याने बऱ्याचवेळा दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकावा लागत होता. एखादे कागदपत्र नसल्यास वेळेवर धावपळ करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त होते. दिवसेंदिवस चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली असल्याने शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ब्रेक टेस्ट ट्रॅक बनवून घेतले आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस