शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ब्रेक टेस्ट ट्रॅक अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:34 IST

गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली.

ठळक मुद्दे३.४० हेक्टरवर निर्मिती : जानेवारीपासून कामाला सुरुवात; ६६ लाखांचा निधी मंजूर

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चारचाकी वाहनांची ब्रेक टेस्ट करण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याच्या कारणावरून वाहनांना पासिंग देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.गोंडवाना विद्यापीठाच्या जवळ उपप्रादेशिक परिवहन विभागाने ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र जमिनीबाबतचा वाद निर्माण झाल्याने ट्रॅक बनविण्याचे काम थांबले होते. गडचिरोली येथे ट्रॅक नसल्याने येथील जड वाहनांना टेस्टसाठी चंद्रपूर, भंडारा किंवा नागपूर येथे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गडचिरोली येथील जड वाहने पासिंगसाठी चंद्रपूर, भंडारा किंवा नागपूर येथे नेली जात होती. या तिन्ही जिल्ह्यांचे अंतर गडचिरोलीपासून १०० किमीपेक्षा अधिक असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून ट्रॅकसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.जिल्हाधिकाऱ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या जवळच ३.४० हेक्टर आर. जमीन उपलब्ध करून दिली आहे. ट्रॅक बनविण्यासाठी शासनाने ६६ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. जानेवारीपासून ट्रॅक बनविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. काम अतिशय गतीने सुरू असून लवकरच काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांसाठी सोयीचे होणार आहे.सदर ट्रॅक अत्याधुनिक पद्धतीने बनविला जात असल्याने वाहनांची ब्रेक टेस्ट अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. जिल्ह्यातच ट्रॅक झाल्याने वाहनधारकांचा पासिंगवर होणारा अनावश्यक खर्चावर प्रतिबंध लागणार आहे. काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे काम उत्तम दर्जाचे होण्याची अपेक्षा आहे.वाहनधारक होते त्रस्तगडचिरोली येथे वाहनांना पासिंग देण्याचे काम बंद झाल्यानंतर वाहने चंद्रपूर, नागपूर, किंवा भंडारा येथे नेली जात होती. बºयाचवेळा वाहनाला पासिंग नसल्याचे कारण सांगून संबंधित जिल्ह्यातील वाहतूक पोलीस वाहन पकडत होते. एका दिवशी पासिंगचे काम होत नसल्याने बऱ्याचवेळा दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकावा लागत होता. एखादे कागदपत्र नसल्यास वेळेवर धावपळ करावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त होते. दिवसेंदिवस चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली असल्याने शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ब्रेक टेस्ट ट्रॅक बनवून घेतले आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस