शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वळूमाता संगोपन केंद्र मोजतोय शेवटच्या घटका

By admin | Updated: September 21, 2015 01:27 IST

ेदेसाईगंज शहरापासून चार किमी अंतरावर कुरखेडा मार्गावर वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

२१६ हेक्टरवर केंद्राचा विस्तार : अनेक इमारती कोसळण्याच्या मार्गावरअतुल बुराडे/विष्णू दुनेदार विसोरा/तुळशीेदेसाईगंज शहरापासून चार किमी अंतरावर कुरखेडा मार्गावर वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र योग्य नियोजनाअभावी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर वळू माता संगोपन केंद्रातील बहुतांश इमारती मोडकडीस आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली, तो उद्देश साध्य झाला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी किमतीत दुधाळ जनावरे उपलब्ध व्हावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना दुधाच्या व्यवसायाकडे प्रेरीत करण्याच्या उद्देशाने १९७४-७५ साली देसाईगंजपासून चार किमी अंतरावर कुरखेडा मार्गावर वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले. सदर केंद्र सुमारे २१६ हेक्टर जागेवर उभारण्यात आले आहे. १९७४ साली या केंद्रात आस्ट्रेलिया देशातून होस्टन या विदेशी जातीच्या १०० गाई येथे आणण्यात आल्या होत्या. गाई ठेवण्यासाठी अनेक मोठे शेड तयार करण्यात आले होते. या शेडमध्ये गायींसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत्या. दुध काढण्यासाठी स्वतंत्र दुग्धशाळा बांधण्यात आली होती. तसेच नवजात वासरांना वेगळ्या शेडमध्ये ठेवण्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आले होते. मात्र योग्य देखभाली अभावी या गायी काही दिवसातच मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे शासनाने १९८७ साली या केंद्राला साहिवाल जातीच्या गायीचे संगोपन केंद्र म्हणून घोषित केले. मात्र या गायींची सुध्दा योग्य देखभाल केली जात नसल्याचे दिसून येते. विदेशातील किंवा दुसऱ्या राज्यातील दुधाळ जनावरे अत्यंत महाग राहतात. त्याचबरोबर सदर जनावरे आपल्या वातावरणात टिकाव धरतील, याचीही शाश्वती देता येत नाही. हे अनेक वेळा प्रयोगाअंती सिध्द झाले आहे. त्यामुळे संकरीत जनावरांची पैदास करण्याकडे भर दिला जातो. ही जनावरे आपल्या वातावरणात तग धरतात. मात्र अनेक शेतकऱ्यांना याबाबतची माहिती राहत नाही. ही बाब लक्षात घेऊन वळू माता पैदास केंद्र स्थापन करण्यात आले. मात्र प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो हेक्टरवरील वळू माता केंद्र आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी होस्टेन जातीच्या गायी आणल्या होत्या. हा केवळ इतिहास बनला आहे. ७२ गायींचे संगोपनया केंद्रात सद्य:स्थितीत एकूण ७२ गायी आहेत. त्यापैकी ४२ संकरीत तर ३० साहिवाल जातीच्या गायी आहेत. या गायींपासून दर दिवशी ४० लिटर दूध उत्पादित होते. नैसर्गिक पैदास करण्यासाठी १०० टक्के सुटीवर वळू (सांड) उपलब्ध करून दिले जातात. २०१४ मध्ये ३२ तर चालू वर्षात सहा वळू उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती वळूमाता संगोपन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.