शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जमीन महसुलावर भर

By admin | Updated: May 7, 2014 02:19 IST

जिल्ह्याला संपूर्ण आर्थिक स्त्रोतांच्या सहाय्याने २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ३५६ कोटी ९४

 : २०१३-१४ मधील जिल्ह्याचे एकूण उत्पन्न ३५७ कोटी रुपये खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अत्यंत कमी

गडचिरोली : जिल्ह्याला संपूर्ण आर्थिक स्त्रोतांच्या सहाय्याने २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये ३५६ कोटी ९४ लाख ८९ हजार १३४ रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षीच्या तुलनेत २०१३-१४ या वर्षाचे उत्पन्न ६३ कोटी ८७ लाख ४० हजार ७७ रूपयाने कमी आहे. नागरिक विविध करांच्या माध्यमातून शासनाकडे पैसा भरत असतात. याची सर्व नोंद जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये ठेवण्यात येते. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये महामंडळावरील करांच्या माध्यमातून केवळ ५२० रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीवर सरकार आयकर आकारते. मागील वर्षी इन्कम टॅक्सच्या माध्यमातून ३ कोटी ४३ लाख ६८ हजार २४० रूपये एवढा महसूल शासनाकडे जमा करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात एकमेव रोजगाराचे साधन शेती आहे. लाखो हेक्टर शेतीवर धान पीक व इतर पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. शासन शेतीवर जमीन महसूल आकाराते. मागील वर्षी ११ कोटी ७७ लाख ६३ हजार ३४ रूपये एवढा जमीन महसूल शासनाकडे जमा करण्यात आला. स्टॅम्प व नोंदणी शुल्काच्या माध्यमातून ६ कोटी ६५ लाख ६ हजार २६६ रूपये, स्टेट एक्साईजच्या माध्यमातून ६३ हजार ४६५ रूपये, विक्रीकराच्या माध्यमातून ३ कोटी ४६ लाख ४० हजार १८९ वाहन कराच्या माध्यमातून ७ कोटी १० लाख ४२ हजार ८६९ रूपयाचा निधी शासनाकडे जमा करण्यात आला आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये सर्व मार्गाने मिळून गडचिरोली जिल्ह्याला ३५६ कोटी ९४ लाख ८९ हजार १३४ रूपये एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे. २०१२-१३ गडचिरोली जिल्ह्याला ४२० कोटी रूपये ८२ लाख २९ हजार २११ रूपये एवढे उत्पन्न प्राप्त झाले होते. २०१२-१३ च्या तुलनेत २०१३-१४ चे उत्पन्न ६३ कोटी ८७ लाख ४० हजार ७७ रूपयाने कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासासाठी शेकडो योजनांवर शासन कोट्यवधी रूपयांची उधळण करीत असले तरी रोजगाराचे साधन व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा वापर करण्यामध्ये अजूनपर्यंत यश प्राप्त झाले नाही.

त्यामुळे येथील नागरिकांचे उत्पन्न कमी आहे. केवळ जमीन महसूल व वनोपजापासून मिळणारे उत्पन्न हे दोनच महत्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. शासनाने येथील साधन संपत्तीचा वापर करून उद्योग निर्मिती केल्यास या उद्योगाच्या माध्यमातून शासनाला महसूल प्राप्त होईल. मात्र अजूनपर्यंत शासनाला यामध्ये यश आलेले नाही. (प्रतिनिधी) ४२०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांवर विविध योजनांच्या माध्यमातून १ हजार ८७८ कोटी ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले. याचवर्षी गडचिरोली जिल्ह्यातून संपूर्ण मार्गाने केवळ ३५६ कोटी ९४ लाख रूपयाचे उत्पन्न शासनाला प्राप्त झाले. आकडेवारीचे निरीक्षण केल्यास खर्चाच्या तुलनेत जिल्ह्याचे उत्पन्न अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. जिल्ह्यामध्ये उद्योग, व्यवसायांची भरभराट झाली नाही. कोट्यवधी रूपयाची साधन संपत्ती असली तरी तिचे खोदकाम अजूनपर्यंत सुरू झाले नाही. त्यामुळे यापासून मिळणार्‍या उत्पन्नाला वंचित राहावे लागत आहे. जंगलातून मिळणारा तेंदूपत्ता, बांबू व सागवान यापासून वनविभागाला थोडेफार उत्पन्न प्राप्त होते. मात्र सदर उत्पन्न इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. नागरिकांचे वार्षिक उत्पन्न कमी असल्याने आयकर भरणार्‍यांची संख्या सुद्धा कमी आहे. रोजगार व उद्योग भरभराटीला आला नसल्याने विक्रीकर यासारख्या करांची रक्कम इतर जिल्ह्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.