शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

शहरवासीयांना दाखल्यांसाठी भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:47 IST

नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्दे१ मे पासून अंमलबजावणी : जन्म दाखल्यासाठी ४०० तर मृत्यू दाखल्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.जिल्ह्यातील कर निर्धारक समितीची ४ एप्रिल रोजी बैठक पार पडली. या बैठकीत नगर परिषद, नगर पंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. तसेच सर्व नगर पंचायत क्षेत्रात एकच शुल्क आकरण्यात यावे, याबाबतही चर्चा झाली. त्यानुसार शुल्कात वाढ करण्यात आली आहे. शुल्कवाढीबाबत नागरिकांचा काहीही आक्षेप नसता, मात्र जुन्या दराच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यापूर्वी २० रुपयांत मिळणाºया दाखल्यासाठी आता ४०० ते ५०० रुपये आकारले जाणार आहेत.यापूर्वी गडचिरोली नगर परिषदेत जन्म व मृत्यूचा दाखला केवळ २० रुपयांना मिळत होता. आता जन्म दाखल्यासाठी ४०० रुपये तर मृत्यू दाखल्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. थकबाकी नसल्याचा दाखला ५०० रुपयांना मिळत होता. आता ६०० रुपये झाला आहे. व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र ५०० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे. विवाह नोंदणी दाखला ७०० रुपयांना मिळत होता. तो आता २ हजार रुपये केला आहे. रहिवासी दाखला २० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे. वीज जोडणीबाबतची एनओसी दाखला ५०० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे.अत्यावश्यक दाखल्यांवर वाढले २५ पटीने शुल्कजन्म, मृत्यू, रहिवासी दाखला हा प्रत्येक नागरिकाला घ्यावाच लागतो. कितीही गरीब असला तरी प्रशासकीय कामासाठी या दाखल्यांची गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन या तिन्ही दाखल्यांसाठी यापूर्वी केवळ २० रुपये शुल्क आकारले जात होते. नवीन नियमात आता जन्म दाखल्यासाठी ४००, मृत्यू दाखल्यासाठी २ हजार व रहिवासी दाखल्यासाठी ६०० रुपये गडचिरोलीवासीयांना मोजावे लागणार आहेत. हा सर्वसामान्य व गरीब नागरिकांवर लादलेला भुर्दंड आहे. या दाखल्यांचे शुल्क २५ पटीने वाढविले आहे. तर दुसरीकडे विद्युत जोडणी दाखला, व्यवसाय नाहरकत दाखला यांच्या शुल्कात नाममात्र वाढ केली आहे. या दोन्ही दाखल्यांची मागणी करणाºया व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण चांगली राहत असल्याने त्यांच्याकडून अधिकचा शुल्क आकारण्यास काहीच हरकत नाही. मात्र या उलट घडले आहे.नागरिकांवर आकारलेले दाखल्यांसाठीचे शुल्क अवास्तव व अन्यायकारक आहेत. मृत्यू दाखला एखाद्या गरीब व्यक्तीला आवश्चयक असल्यास तो कुठून २ हजार रुपये आणणार, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, जन्म, मृत्यू व रहिवासी दाखला यांच्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.- संजय मेश्राम, नगरसेवक नगर परिषद गडचिरोली