शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

भूमिगत पुलालगत गतिरोधकाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:31 IST

शहरातील रेल्वे भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचा अभाव असल्याने येथे होणाऱ्या किरकोळ अपघातात वाढ झाली आहे. परंतु येथे गतिरोधक निर्माण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देकिरकोळ अपघात वाढले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे होतेय दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : शहरातील रेल्वे भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाचा अभाव असल्याने येथे होणाऱ्या किरकोळ अपघातात वाढ झाली आहे. परंतु येथे गतिरोधक निर्माण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.देसाईगंज येथील रेल्वेच्या भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक नसल्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत आहेत. रेल्वे फाटकाच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले. भूमिगत पुलाच्या निर्मितीमुळे गोंदिया-बल्हारशा रेल्वे मार्गावरील मालवाहू व प्रवाशी रेल्वेगाड्यांच्या रहदारीने वारंवार बंद होणाऱ्या फाटकामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पुलाच्या निर्मितीमुळे मुख्य मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला रहदारीच्या मुख्य मार्गाने जोडणारा रस्ता झाला आहे. त्यामुळे भूमिगत पुलामधून निघणाऱ्या वाहनांना कुरखेडाकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची धडक होण्याची भीती दिवसागणिक वाढत आहे. कुरखेडा मार्गावर भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधकाची मागणी कित्येक दिवसापासून होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यामागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.जडवाहनांची वाहतूककेवळ हलक्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी भूमिगत पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र या भूमिगत पुलातून रेती वाहतुकीचे टिप्पर तसेच इतर जडवाहन आवागमन करीत असतात. अनेकदा जड वाहतुकीमुळे या पुलातील रहदारीत व्यत्यय येता. मात्र वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रास जड वाहतूक होतांना दिसून येत आहे.