शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याबाबत धोरणाचा अभाव

By admin | Updated: July 6, 2016 01:49 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५० ते ६० पदे विविध रूग्णालयात रिक्त आहे.

गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ५० ते ६० पदे विविध रूग्णालयात रिक्त आहे. या रूग्णालयांमध्ये डॉक्टर नसल्याने अस्थायी डॉक्टर व प्रतिनियुक्तीवर दिलेले डॉक्टर कशीबशी सेवा देत आहे. नव्या राज्य सरकारला गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीबाबतचे धोरण अद्यापही निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडलेल्या स्थितीत आहे.गडचिरोली जिल्हा मुख्यालयात जिल्हा सामान्य रूग्णालय, अहेरी, कुरखेडा, आरमोरी येथे उपजिल्हा रूग्णालय तर उर्वरित तालुक्यात ग्रामीण रूग्णालय कार्यरत आहे. गेल्यावेळी राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती किमान ५० ते ८० हजार रूपये पगाराच्या मानधनावर करण्याचे ठरविले होते. मात्र या भरती प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ सात वैद्यकीय अधिकारीच रूजू झाले. त्यामुळे दुर्गम भागातील रूग्णालयांना वैद्यकीय अधिकारी मिळू शकले नाही. याशिवाय मागील दोन वर्षांपासून गडचिरोली येथे महिला व बाल रूग्णालयाची इमारत सज्ज झाली आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची जवळजवळ १५० पदे भरावयाची आहेत. परंतु या पदभरतीला राज्य सरकारने मंजुरी दिलेली नाही. गेल्या अधिवेशनात आमदार डॉ. देवराव होळी यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. रूग्णालय बांधकामाला मंजुरी देतानाच पदभरतीलाही मंजुरी द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतरही महिला व बाल रूग्णालयाला डॉक्टर मिळालेले नाहीत. सिरोंचा, कोरची, भामरागड, एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्याने अनेक रूग्णांना अहेरी व गडचिरोली येथे पाठविले जाते. हे रूग्णालय केवळ रूग्ण रेफर करण्यासाठीच शासन चालवित असल्याचे जनतेचे मत झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)कुठे आहे सरकारच्या यंत्रणेत दोषराज्य सरकारकडून शिक्षणासाठी पैसा घेऊन वैद्यकीय शिक्षण घेणारे बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्यासाठी येत नाही. येथे बदली झाल्यावर ते रद्द करण्यासाठी प्रयत्न करतात व रूजू होऊन गायब राहून आपला पगारही यंत्रणेकडून घेतात. गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी येण्यासाठी त्यांना बदलीचा आदेश देतानाच तीन वर्षानंतर येथून रिलीव्ह होऊन दुसऱ्या गावी बदलीवर जाण्याचा आदेश पुढील तारखेत द्यावा, जेणे करून त्यांना तीन वर्षानंतर आपण येथून बदलून जाऊ याची १०० टक्के शाश्वती मिळेल व ते येथे येऊन काम करण्यास तयार होतील. देशाच्या अन्य आदिवासी बहूल भागात अशा प्रकारची व्यवस्था ओरीसा सारख्या राज्यात करण्यात आली आहे, असे अनेक डॉक्टर लोकमतशी बोलताना म्हणाले. शासन गडचिरोलीत काम करा, असे सांगते. मात्र तीन वर्षानंतर बदलीचा नियम असतानाही इच्छीत स्थळी बदली देत नाही. त्यामुळे येथे काम करण्यासाठी कुणीही येण्यास तयार नाही. गडचिरोलीत येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला खासगी सेवा करण्याची संधीही शासनाने द्यावी जेणे करून येथील दवाखाण्यात गरीब रूग्णांना किमान डॉक्टर तरी उपलब्ध होतील. गडचिरोलीसाठी अतिरिक्त पगार वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला जातोच, मात्र याशिवाय आणखी काही सोयीसुविधा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यास आरोग्य संस्थांचे बळकटीकरण होईल. या दृष्टीने राज्य सरकारने धोरण तयार करण्याची गरज आहे. परंतु राज्य सरकारही केवळ वेळकाढू भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.