शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:05 IST

विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची साधने अपुरी : ट्रॅक्टरवर खाट मांडून रुग्णाला आणले रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार २१ जुलै रोजी रविवारला एटापल्ली तालुक्यात उघडकीस आला.एटापल्लीपासून सात किमी अंतरावर असलेल्या वासामुंडी येथील एका रूग्णास ट्रॅक्टरवर खाट मांडून त्यावर त्याला झोपवून एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकासह इतर वाहतुकीच्या साधनांची कमतरता असल्याने गंभीर रूग्ण, गर्भवती माता तसेच बालके वेळेवर तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी कित्येकांना जीव गमवावा लागल्या घटनाही घडलेल्या आहेत. अहेरी उपविभागात आरोग्य व रूग्णसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही गेल्या दोन ते तीन वर्षात सरकार व प्रशासनाला अहेरी उपविभागातील आरोग्य सेवा व वाहतूक सेवा बळकट करता आली नाही. एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात भ्रमणध्वनी सेवा हवी तशी प्रभावी नाही. परिणामी बऱ्याचदा संपर्कही होत नाही. संपर्क झाला तरी इतर अडचणी जाणवतात. परिणामी एटापल्ली तालुक्यात रूग्णांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्याचा काही भाग छत्तीसगड सिमेला लागून आहे. एटापल्ली तालुक्याला दुसरा तालुका जुळलेला नाही. एटापल्ली जवळ पाच ते दहा किमी अंतरावर अनेक गावांची सीमा समाप्त होते. तालुक्यात २०० गावे असून भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. शिवाय घनदाट जंगल व बारमाही वाहणारे नदी, नाले आहेत. रस्त्या-रस्त्यावर नाले व नदी पडत असल्याने या तालुक्यात वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.रस्ते, वीज व बससेवाही ऐरणीवरएटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कित्येक गावांना पोहोचण्यासाठी अजुनही पक्के रस्ते नाहीत. शिवाय बºयाच गावांमध्ये वीज पुरवठा पोहोचला नाही. बस सेवा व मोबाईल नेटवर्कची समस्या भारी झाली आहे. एकूणच एटापल्ली तालुक्यात समस्यांची भरमार असून येथील आदिवासी व गैरआदिवासी लोकांचे जगणे कठीण झाले आहे.