शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:05 IST

विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची साधने अपुरी : ट्रॅक्टरवर खाट मांडून रुग्णाला आणले रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार २१ जुलै रोजी रविवारला एटापल्ली तालुक्यात उघडकीस आला.एटापल्लीपासून सात किमी अंतरावर असलेल्या वासामुंडी येथील एका रूग्णास ट्रॅक्टरवर खाट मांडून त्यावर त्याला झोपवून एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकासह इतर वाहतुकीच्या साधनांची कमतरता असल्याने गंभीर रूग्ण, गर्भवती माता तसेच बालके वेळेवर तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी कित्येकांना जीव गमवावा लागल्या घटनाही घडलेल्या आहेत. अहेरी उपविभागात आरोग्य व रूग्णसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही गेल्या दोन ते तीन वर्षात सरकार व प्रशासनाला अहेरी उपविभागातील आरोग्य सेवा व वाहतूक सेवा बळकट करता आली नाही. एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात भ्रमणध्वनी सेवा हवी तशी प्रभावी नाही. परिणामी बऱ्याचदा संपर्कही होत नाही. संपर्क झाला तरी इतर अडचणी जाणवतात. परिणामी एटापल्ली तालुक्यात रूग्णांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्याचा काही भाग छत्तीसगड सिमेला लागून आहे. एटापल्ली तालुक्याला दुसरा तालुका जुळलेला नाही. एटापल्ली जवळ पाच ते दहा किमी अंतरावर अनेक गावांची सीमा समाप्त होते. तालुक्यात २०० गावे असून भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. शिवाय घनदाट जंगल व बारमाही वाहणारे नदी, नाले आहेत. रस्त्या-रस्त्यावर नाले व नदी पडत असल्याने या तालुक्यात वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.रस्ते, वीज व बससेवाही ऐरणीवरएटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कित्येक गावांना पोहोचण्यासाठी अजुनही पक्के रस्ते नाहीत. शिवाय बºयाच गावांमध्ये वीज पुरवठा पोहोचला नाही. बस सेवा व मोबाईल नेटवर्कची समस्या भारी झाली आहे. एकूणच एटापल्ली तालुक्यात समस्यांची भरमार असून येथील आदिवासी व गैरआदिवासी लोकांचे जगणे कठीण झाले आहे.