शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:05 IST

विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची साधने अपुरी : ट्रॅक्टरवर खाट मांडून रुग्णाला आणले रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : विद्यमान केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन आरोग्य सेवा काही प्रमाणात बळकट झाल्याच्या बाता करीत असल्या तरी गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहे. एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात रूग्णवाहिकांचा अभाव तसेच वाहतुकीची साधने अपुरी असल्यामुळे रूग्णांना मिळेल त्या साधनाने तालुका मुख्यालयाच्या रूग्णालयात न्यावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार २१ जुलै रोजी रविवारला एटापल्ली तालुक्यात उघडकीस आला.एटापल्लीपासून सात किमी अंतरावर असलेल्या वासामुंडी येथील एका रूग्णास ट्रॅक्टरवर खाट मांडून त्यावर त्याला झोपवून एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. एटापल्ली तालुक्यात रूग्णवाहिकासह इतर वाहतुकीच्या साधनांची कमतरता असल्याने गंभीर रूग्ण, गर्भवती माता तसेच बालके वेळेवर तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही. परिणामी कित्येकांना जीव गमवावा लागल्या घटनाही घडलेल्या आहेत. अहेरी उपविभागात आरोग्य व रूग्णसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही गेल्या दोन ते तीन वर्षात सरकार व प्रशासनाला अहेरी उपविभागातील आरोग्य सेवा व वाहतूक सेवा बळकट करता आली नाही. एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात भ्रमणध्वनी सेवा हवी तशी प्रभावी नाही. परिणामी बऱ्याचदा संपर्कही होत नाही. संपर्क झाला तरी इतर अडचणी जाणवतात. परिणामी एटापल्ली तालुक्यात रूग्णांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्याचा काही भाग छत्तीसगड सिमेला लागून आहे. एटापल्ली तालुक्याला दुसरा तालुका जुळलेला नाही. एटापल्ली जवळ पाच ते दहा किमी अंतरावर अनेक गावांची सीमा समाप्त होते. तालुक्यात २०० गावे असून भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. शिवाय घनदाट जंगल व बारमाही वाहणारे नदी, नाले आहेत. रस्त्या-रस्त्यावर नाले व नदी पडत असल्याने या तालुक्यात वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.रस्ते, वीज व बससेवाही ऐरणीवरएटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कित्येक गावांना पोहोचण्यासाठी अजुनही पक्के रस्ते नाहीत. शिवाय बºयाच गावांमध्ये वीज पुरवठा पोहोचला नाही. बस सेवा व मोबाईल नेटवर्कची समस्या भारी झाली आहे. एकूणच एटापल्ली तालुक्यात समस्यांची भरमार असून येथील आदिवासी व गैरआदिवासी लोकांचे जगणे कठीण झाले आहे.